एक्स्प्लोर

IPL 2022 : आरसीबीचा माजी खेळाडू म्हणतोय, विराट कोहलीला आरामाची गरज 

Virat Kohli, IPL 2022 : रनमशिन विराट कोहलीची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांतच आहे. आयपीएलमध्येही विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

Virat Kohli, IPL 2022 : रनमशिन विराट कोहलीची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांतच आहे. आयपीएलमध्येही विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहली दोन वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालाय. लागोपाठ सामन्यात अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीला राजस्थानविरोधात सलामीला पाठवण्यात आले. मात्र, विराट पुन्हा अपयशी ठरला. सलामीला आलेला विराट फक्त 9 धावा काढून माघारी परतला. खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर टीकास्त्र सोडलं जात आहे. अनेक क्रीडा तज्ज्ञांनी विराट कोहलीचा बॅडपॅच सुरु असल्याचे सांगितले. विराट लवकरच पुनरागमन करेल, असेही काहींनी सांगितले. आरसीबीचा माजी खेळाडू आरपी सिंह याने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह याने विराट कोहलीला आरामाची गरज असल्याचे सांगितले. आरपी सिंह आरसीबीकडून खेळलाय. आरपी सिंह म्हणाला की, 'विराट कोहलीने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये विराट कोहलीचं नाव आहे. पण गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट शांत आहे.' आरसीबीने विराट कोहलीला आराम द्यायला हवा, असेही आरपी सिंह म्हणाला. 

आरसीबी संघ व्यवस्थापन आणि विराट कोहली फॉर्ममधून परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यामध्ये यश मिळत नाही. अशात विराट कोहलीला आराम करण्याची गरज आहे. आणखी एक दोन सामन्यात विराट कोहली फ्लॉप झाल्यास आरसीबीने आराम द्यावा, असे आरपी सिंह म्हणाला.

 मंगळवारी राज्यस्थान रॉयल्सविरोधात सलामीला आलेला विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला. 10 चेंडूत 9 धावा काढून विराट माघारी परतला. विराट कोहली यावेळी रंगात दिसला नाही. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर विराट तंबूत परतला. राजस्थानने या सामन्यात आरसीबीचा 29 धावांनी पराभव केला.  

2019 पासून विराटची बॅट शांत -
विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीची धावांचू भूक पाहून त्याला रनमशीनही म्हटले जाते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीसारखा भरवशाचा फलंदाज दुसरा कुणीच नाही. पण मागील काही हंगामापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी आले होते. बांगलादेशविरोधात झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएलमध्ये 2016 चा अपवाद वगळता त्यानंतर प्रत्येक हंगामात विराट कोहलीची बॅट शांतच राहिली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : 96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
Vaibhav Sooryavanshi GT vs RR IPL 2026 : वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?
हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget