एक्स्प्लोर

World Cup 2019 | इंग्लंडला ओव्हरथ्रोवर सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा : सायमन टॉफेल

न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

लंडन : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करुन पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं आहे. इंग्लंडच्या विजयात अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरील ओव्हरथ्रोसह मिळालेल्या सहा धावांनी निर्णायक भूमिका बजावली. परंतु आयसीसी पॅनेलवरचे माजी पंच सायमन टॉफेल यांनी सहा धावा देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या ओव्हरथ्रोवर इंग्लंडला सहा धावा बहाल करण्याचा मैदानातल्या पंचांचा निर्णय चुकीचा होता, असं खळबळजनक विधान सायमन टॉफेल यांनी केलं आहे. इंग्लंडच्या डावात ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्सने आदिल रशिदच्या साथीने दोन धावा पळून काढल्या. त्याच वेळी मार्टिन गप्टिलने केलेल्या ओव्हरथ्रोवर, चेंडू स्टोक्सच्या बॅटवर आदळून सीमापार झाला. त्यावेळी पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या होत्या. यामध्ये स्टोक्स आणि आदिलने धावून काढलेल्या दोन धावा आणि ओव्हरथ्रोच्या चार धावांचा समावेश आहे. याचा फायदा इंग्लंडला मिळाला आणि सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये गेला. World Cup 2019 | इंग्लंडच्या विजयानंतर आयसीसीच्या बाऊंड्री काऊंट नियमावर खेळाडूंची नाराजी सायमन टॉफेल यांच्या मते, "त्यावेळी पंचांनी सहाऐवजी पाच धावा देणं अपेक्षित होतं. कारण गप्टिलने थ्रोची कृती केली, त्यावेळी स्टोक्स आणि रशिदने पहिली धाव पूर्ण केली होती. पण त्या दोघांनी दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना ओलांडलं नव्हतं." निश्चितच पंचांकडून चूक झाली आणि त्याचा फायदा इंग्लंडला मिळाला. कारण इंग्लंडच्या खात्यात केवळ धाव जमा झाली नाही तर स्टोक्सही स्ट्राईकवर परतला. जर त्यावेळी इंग्लंडला 6 ऐवजी 5 धावाच दिल्या असत्या, तर त्याला अखेरच्या दोन चेंडूत चार धावांची आवश्यकता असतील. ICC World Cup 2019 : विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली! काय आहे आयसीसीचा नियम? आयसीसीच्या नियम 19.8 नुसार, जर क्षेत्ररक्षकाचा ओव्हरथ्रो किंवा आणखी कोणत्या कारणाने चेंडू सीमारेषा पार गेल्यास संघाला.. - पेनल्टीच्या धावा - चौकाराच्या धावा - थ्रो करेपर्यंत फलंदाजांनी पूर्ण केलेल्या धावा World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी जर या नियमांवर लक्ष दिलं तर गप्टिलने चेंडू थ्रो करेपर्यंत स्टोक्स आणि राशिदने पहिली धाव पूर्ण केली होती. पण दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना ओलांडलं नव्हतं. त्यामुळे इंग्लंडला केवळ 5 धावा द्यायला हव्या होत्या. सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंड विजयी न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget