एक्स्प्लोर

ICC T20 World Cup 2021 : T20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान भिडणार, 'या' तारखेला दुबईत होणार सामना

ICC T20 World Cup 2021: क्रिकेट चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे आनंदाची पर्वणी असतो. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे

ICC T20 World Cup 2021: क्रिकेट चाहत्यांसाठी भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे आनंदाची पर्वणी असतो. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे.  भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडल्यामुळं दोन देशांतील क्रिकेट सामन्यांच्या मालिका कित्येक वर्षापासून खेळल्या गेलेल्या नाहीत.  

टी20 वर्ल्ड कपची सुरुवात यावर्षी 17 ऑक्टोबरपासून UAE मध्ये होणार आहे. या विश्वचषकात सर्वांचं लक्ष भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेटचे चाहते या सामन्याची वाट पाहून आहेत.  दोन वर्षांपूर्वी आयसीसीच्या वन डे विश्वचषकात याच दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना रंगला होता. आणि आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. 

ICC T20 World Cup 2021 Groups : आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकपमधील ग्रुपची घोषणा; भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

आयसीसीकडून टी20 विश्वचषकाची गटवारी जाहीर

आयसीसीने टी20 विश्वचषकाची गटवारी नुकतीच जाहीर केली. यात भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटातल्या या संघांमध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडसह पात्रता फेरीतल्या दोन संघांचा समावेश असणार आहे. तर अ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतून येणारे दोन संघ असतील. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा पार पडणार आहे.

IND vs PAK : फिरसे एक बार.... मौका मौका

विश्वचषकात टीम इंडियाच सरस

ट्वेन्टी ट्वेन्टी असो किंवा वन डे विश्वचषक. क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावरच्या या महासंग्रात नेहमीच टीम इंडियानं वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आजवर भारत आणि पाकिस्तान संघात पाच लढती झाल्या आहेत. त्या पाचही लढतीत भारतीय संघ वरचढ ठरला आहे. 2007 च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने पाकिस्तानचाच पराभव करत अजिंक्यपद पटकावले होते. 1992 पासून वन डे विश्वचषकतही भारताने विजयाची परंपरा 2019 च्या इंग्लंडमधल्या विश्वचषकापर्यंत कायम राखली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याचा 'मौका' टीम इंडियाला मिळणार आहे.

स्पर्धा परदेशात पण, यजमान भारतच!

खरंतर यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक भारतात होणार होता. पण भारतातल्या कोरोना परिस्थितीमुळे बीसीसीआयने स्पर्धा परदेशात खेळवण्याचा निर्णय घेतला.  संयुक्त अरब अमिरात आणि  ओमान या दोन देशातल्या चार शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. पण स्पर्धा देशाबाहेर असली तरी यजमानपद मात्र भारताकडेच राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs ZIM 1st T20 Team India Playing XI: प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
प्रिन्स यादव, रवी बिश्नोई IN, रिंकू सिंग OUT...; झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shreyas Iyer : अपयशाची भीती बाळगू नका, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम सज्ज  
अपयशाची भीती बाळगू नका, दोन मालिकेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला कॅप्टन श्रेयस अय्यरचा सल्ला
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सज्ज, इंग्लंडमधील अपयशावर 'बेबी बॉस' म्हणाला...
क्रिकेटमध्ये चढ उतार येतात, वैभव सूर्यवंशीची इंग्लंडमधील अपयशावर पहिली प्रतिक्रिया... झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget