एक्स्प्लोर

Womens U19 T20 WC 2023: अंडर 19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज, समोर इंग्लंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

INDW vs ENGW U-19 T20 WC: अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला मात देत फायनल गाठली आहे.

Team India in WC : स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) T20 विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फायनल गाठली आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड संघाला 8 विकेट्सने मात देत भारताने फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे.याआधी टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं होत. 

अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाची फायनल आज (29 जानेवारी) पार पडणार असून भारताचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना म्हणजेच आज 29 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघाचा स्पर्धेतील फॉर्म पाहता ही फायनल अगदी चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय वर्ल्डकपमधील संघाची कामगिरी 

अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये (Under 19 Womens T20 World Cup) भारताची कामगिरीही (Team India) देखील चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतानं आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला.

कधी, कुठे पाहाल सामना?

भारत आणि न्यूझीलंड हा महिला अंडर 19 विश्वचषकातील सामना आज अर्थात रविवारी 29 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.45 मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे खेळवला जाणार आहे.  

सेमीफायनलचा लेखा-जोखा

सेमीफायलनमध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्याचा विचार करता भारताने भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. न्यूझीलंड संघाला स्वस्तात रोखून नंतर आक्रमक खेळाच्या जोरावर विजय मिळवण्याची भारताची रणनीती होती. जी यशस्वी देखील झाली. अवघ्या 107 धावाच न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत करु शकला. प्लिमर हिने सर्वाधिक 35 धावा यावेळेस केल्या. भारताकडून परश्वी चोप्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तितास सिद्धू, शेफाली वर्मा, मन्नत कश्यप, अर्चना देवी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ज्यानतर फलंदाजीला आलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. ज्यामुळे केवळ 14.2 षटकांत दोन विकेट्स गमावून भारताने 110 धावा करत 8 विकेट्सनी मॅच जिंकली. यावेळी श्वेता शेहरावत हिने नाबाद 61 धावांची तर शेफालीने 10 सौम्याने 22 आणि गोंगादी त्रिशाने नाबाद 5 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताने 8 विकेट्सने सामन्यात विजय मिळवला.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget