![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs PAK : न्यूझीलंडच्या रॉस टेलरकडून विराटचं खास क्लबमध्ये स्वागत, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
Virat Kohli Asia Cup 2022 : भारताने आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सच्या फरकाने मात दिली. हा सामना विराट कोहलीसाठी खास होता.
![IND vs PAK : न्यूझीलंडच्या रॉस टेलरकडून विराटचं खास क्लबमध्ये स्वागत, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा Virat Kohli Played 100th t20 for india ross taylor congratulates him and welcomes him to club after India vs Pakistan Asia Cup 2022 IND vs PAK : न्यूझीलंडच्या रॉस टेलरकडून विराटचं खास क्लबमध्ये स्वागत, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/e629fdaed39a1a61a224b14710427ed01661776814171323_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virat Kohli T20 Match : आशिया कप 2022 च्या (Asia Cup 2022) सलामीच्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने पाकिस्तानला मात दिली. यावेळी भारतीय संघाने आधी पाकिस्तानला 147 धावांत रोखलं आणि नंतर भारताने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत विजय मिळवला. यावेळी क्रिकेटप्रेमींचं सर्वाधिक लक्ष माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर होतं. त्याने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली देखील सोबतच त्याने आपला 100 वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत इतिहास रचला. यामुळे तो 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यांच्या यादीत पोहोचला आहे. यावेळी न्यूझीलंडचा माजी खेळाडू रॉस टेलरने (Ross taylor) त्याला शुभेच्छा देत या खास क्लबमध्ये तुझं स्वागत असं ट्वीट केलं आहे.
यावेळी ट्वीटमध्ये रॉसनं विराटला 100 व्या टी20 सामन्यासाठी शुभेच्छा तर दिल्याच आहेत, शिवाय त्याने त्याला संदेशही दिला आहे. रॉसने लिहिलं आहे की, अभिनंदन! तुझ्या 100 व्या टी20 सामन्याबद्दल तुझं अभिनंदन. मी भविष्यात तुझे आणखी खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहे.!
सामन्याचा लेखा-जोखा
सामन्यात आधी भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पाकिस्ताननं 147 धावा केल्या. यावेळी मोहम्मद रिझवानच्या 43 आणि इफ्तिकारच्या 28 तसंच दहानीच्या याच्या स्फोटक 16 धावा पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या ठरल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 तर हार्दिक पांड्याने 3, अर्शदीपने 2 आणि आवेश खाननं एक विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला.
यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं. भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)