एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 : रोहितच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकण्याची पुन्हा संधी; 2023 च्या पराभवाचा वचपा काढणार

T20 World Cup 2024 : 1 जूनपासून टी-20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होत आहे. त्यासाठी, बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली.

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफलातून कामगिरी केली होती. भारताने सगल 10 सामने जिंकत जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाकडे वळवल्या होत्या. त्यात, कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक झालं. मात्र, अंतिम सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्मासह कोट्यवधी भारतीयांचे डोळे विश्वविजयातील अंतिम सामन्यात पाणावले होते. मात्र, आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया विश्वविजयाचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यामुळे, रोहित शर्मा गत टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढून भारताला विश्वचषक मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

1 जूनपासून टी-20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होत आहे. त्यासाठी, बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. त्यामध्ये, रोहित शर्माकडेच संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, गत 2023 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम रोहित पुन्हा सज्ज होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या माध्यमातून रोहितच्या संघात रोहित शर्मासह यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे. तर, दुबे यालाही संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.

टीम रोहितच्या नेतृत्वात भारत पुन्हा एकदा विश्वचषकाच्या मैदनात उतरणार असून 2023 च्या विश्वचषकातील दैदिप्यमान कामगिरीनंतरही अंतिम सामन्यात पराभव स्वीकारा लागल्याने निराश झालेल्या कोट्यवधी भारतीयांना पुन्हा विश्वविजय पाहण्याची संधी मिळाली आहे. 

पराभवानंतर मोदींनी दिला होता धीर

2023 च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत झाली होती. या सामन्यात 6 विकेटने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने गमावली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 241 धावा काढल्या होत्या. त्यानंतर, 241 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघालाही पहिल्या 10 षटकात चांगलेच धक्के बसले होते. मात्र, ऑस्ट्रेलियने फलंदाज  ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला. कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघही निराश झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: ड्रेसिंग रुममध्ये येऊन भारतीय संघाली धीर देण्याचा प्रयत्न केला होता. मोदींचे ते व्हिडिओही चांगलेच व्हायरल झाले होते. 

आता, पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया जगजेत्ता होण्यासाठी जून महिन्यात मैदानावर उतरणार आहे. यंदा सामना टी-20 विश्वचषकाचा असणार आहे. मात्र, 140 कोटी भारतीयांना पुन्हा एकदा रोहितच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकायचा असून एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढायचा आहे. त्यासाठी, टीम रोहित अन् टीम इंडिया सज्ज झालीय. 

2007 मध्ये भारताने जिंकला वर्ल्डकप

भारतीय संघाने 2007 मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, भारताला टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. गत 2022 मध्ये इंग्लंडच्या संघाने टी-20 विश्वचषक जिंकून दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला आहे. तर, भारत यंदा टी-20 च्या दुसऱ्या विश्वविजयासाठी पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे.  

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget