एक्स्प्लोर

विश्वविजेत्यासाठी मुंबई पुन्हा थांबणार, सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाहतूक मार्गात बदल

2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरलेय. विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत.

Indian Cricket Team In Mumbai :  तब्बल 13 वर्षानंतर टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरले. बार्बाडोसवरुन टीम इंडिया रवाना झाली असून गुरुवारी पहाटे दिल्लीमध्ये आगमन होणार आहे. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात प्रथमच टी-20 वर्ल्ड कप जिंकला. विश्वचषकात टीम इंडिया अजेय राहिली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. बेरीस चक्रीवादळाच्या संकटामुळे भारतीय संघ बार्बाडोसला अडकला होता. विशेष विमानाने टीम इंडिया भारतात परतणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी, बीसीसीआय अधिकाऱ्यांसाठी, आणि स्पोर्ट्स स्टाफसाठी चार्टड प्लेनची व्यवस्था केली. गुरुवारी पहाटे दिल्ली एअरपोर्टवर टीम इंडिया दाखल होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडिया ब्रेकफास्ट करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहे. सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. 

2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जगज्जेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक निघाली होती. तब्बल आठ तास चाललेल्या विश्वविजयी मिरवणूक संघाचे स्वागत करण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा एकदा भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरलेय. विश्वविजेत्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी  पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज झाले आहेत.

सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज

विश्वविजेत्यांच्या शोभायात्रेसाठी मुंबई पोलीस सज्ज आहे. काही वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे त्यांची शोभायात्रा आयोजीत करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीसही सज्ज झाले असून वानखेडे स्टेडियमसह शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर एन.एस मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक मार्गात बदल -

वीर नरीमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय.ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत.

कोस्टल मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर वाहने उभी करण्यास रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दला व अतिमहत्त्वााच्या व्यक्तीची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.  सायंकाळी पाच नंतर आयोजीत शोभायात्रेसाठी पोलीस वानखेडे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे. या शोभयात्रे निमित्त पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तसेच शोभयात्रेत सहभागी होण्यासाठी 4.30 वाजण्यापूर्वी मरीनड्राईवह येथे सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वानखडे स्टेडिअमच्या आतही विजयीशोभयात्रा होणार आहे. त्यासाठी चाहत्यांनी सहा वाजताच्या आत वानखडे स्टेडिअम मध्ये प्रवेश करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 06 जुलै 2024 :  ABP MajhaNashik Ramkund  : रामकुंड घाटावर होणाऱ्या बांधकामाला पुरोहित संघाचा विरोधTuljapur Chocolate Har : तुळजाभवानीला भक्ताकडून चॉकलेटचा हारNana Patole Full PC :  भ्रष्ट लोकांचे सरदार नरेंद्र मोदी ; नाना पटोलेंची तिखट टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज, स्वागतासाठी 40 फूट लांब आणि 150 किलोचा हार 
मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज, स्वागतासाठी 40 फूट लांब आणि 150 किलोचा हार 
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा
Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा
Embed widget