एक्स्प्लोर

IND vs ENG | इंग्लंडची मालिकेत सरशी; लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली म्हणतो...

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव झाला आहे, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs ENG : हिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव करत विजय मिळवला आहे. इंग्लंडसोबतच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, या पराभवासाठी आमच्याकडे कोणतंच कारण नाही. तसेच पुढे बोलताना विराट कोहली म्हणाला की, माझ्याकडे एक असा संघ आहे जो आपल्या पराभवाचा स्विकार करतो आणि पराभवातून शिकतो.

चेन्नई कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, "कोणतंच कारण नाही. आम्ही एक अशी टीम आहोत, जी आपला पराभव मान्य करते आणि त्यातून शिकते. एक गोष्ट तर ठरलेली आहे की, आता पुढील तीन सामने आणखी आव्हानात्मक असणार आहेत. ते आम्हाला अशाप्रकारे गमावता येणार नाहीत. त्यामुळे पढील सामन्यांसाठी आम्हाला खेळपट्टीचा अभ्यास करावा लागेल आणि गोलंदाज काय करणार आहेत, हे देखील जाणून घ्यावं लागेल. आम्हाला माहित आहे की, कसं वापसी करायची आहे. पुढील सामन्यांमध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरु आणि पूर्ण प्रयत्न करु"

विराट बोलताना म्हणाला की, "विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी आपल्या गोलंदाजी युनिटची आवश्यकता आहे. परंतु, आम्हाला ते या सामन्यात शक्य झालं नाही. आम्ही आमची धोरणे नीट अंमलात आणू शकलो नाही. परंतु आपल्यासाठी योग्य मानसिकता असणे महत्वाचे आहे."

कर्णधार विराट कोहली बोलताना म्हणाला की, "या सामन्यात संघाची देहबोली ठीक नव्हती आणि त्याचवेळी संघ आक्रमकताही दाखवू शकला नाही." पुढे बोलताना कोहली म्हणाला की, "आपली देहबोली ठीक नव्हती आणि आक्रमकतेचाही अभाव होता. दुसऱ्या डावात आम्ही काही प्रमाणात व्यवस्थित होतो. सुरुवातीचे चार फलंदाज वगळता आम्ही पहिल्या डावाच्या दुसऱ्या भागांत व्यवस्थित खेळलो. फलंदाजीत आम्ही पहिल्या डावात व्यवस्थित खेळलो. पण आम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तसेच लवकरात लवकर यामध्ये सुधारणा कराव्या लागतील."

पहिल्या दिवसापासून इंग्लंंडची सामन्यावर पकड

चेन्नई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून इंग्लंडने सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जो रूटच्या 218 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताचा संघ 337 धावांवर आटोपला. भारताकडून पंतने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पहिल्या डावात इंग्लंडकडून डॉम बाईस चार विकेट्स घेतल्या. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 178 धावांवर आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडला 241 धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताला विजयासाठी 420 धावांचे मोठे आव्हान मिळाले. शेवटच्या दिवशी टी ब्रेक होण्यापूर्वी भारताचा संघ 192 धावांवर बाद झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा कायम ठेवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar on Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची एलिमिनेटर मॅचमध्ये वादळी खेळी, क्रिकेटच्या देवालाही बोलायला भाग पाडलं, सचिन तेंडुलकर म्हणाला...
SRH vs RR Eliminator IPL 2026 : 29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
29 चेंडूत वैभव सूर्यवंशीचा महाप्रलय! एलिमिनेटरमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर हैदराबाद बाहेर, राजस्थानचे 'रॉयल्स' आता क्वालिफायर-2मध्ये
SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
SRH vs RR Eliminator Update : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये
Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video
12 षटकार... 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
Shraddha Kapoor: पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
पजामा - टी शर्ट अन् केसांचा बन, घरात बेभान होऊन नाचली श्रद्धा कपूर; नेटकरी म्हणाले, आधी घर साफ कर..
Uday Samant : पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा यापुढे खपवून घेणार नाही, उदय सामंत यांचा महेश शिंदेंचे नाव न घेत इशारा  
फलटणला पुढील आमदार शिवसेनेचाच, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास, कारणही सांगितलं...
Embed widget