एक्स्प्लोर

Team India Champions Trophy 2025 : तयार होऊन बसले तरी रोहितकडून संधी नाहीच, भारताचे 'हे' तुफानी त्रिकुट संघाच्या बाहेरच, फायनलमध्ये मारणार एन्ट्री?

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताला फक्त एक सामना जिंकायचा आहे आणि त्यानंतर आणखी एक आयसीसी जेतेपद आपल्या नावावर होईल.

Team India Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताला फक्त एक सामना जिंकायचा आहे आणि त्यानंतर आणखी एक आयसीसी जेतेपद आपल्या नावावर होईल.अंतिम सामन्यासाठी अजून वेळ असला तरी, सर्वांच्या नजरा त्यावर आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाने ज्या पद्धतीने सातत्याने कामगिरी केली आहे, त्यामुळे विरोधी संघ घाबरले आहेत. कारण त्यांना माहित आहे की भारताला हरवणे सोपे होणार नाही. दरम्यान, टीम इंडियामध्ये असे तीन खेळाडू आहेत जे संघात आहेत, परंतु त्यांना अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.  

IPLच्या सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत बसला बेंचवर

बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. पण, नंतर त्यात काही बदल करण्यात आले. दरम्यान, कोणत्याही सामन्याच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये तीन खेळाडू दिसले नाहीत. यामध्ये पहिले नाव ऋषभ पंतचे आहे. जगातील सर्वात आक्रमक फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. खरं तर, तो सध्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला एलएसजीने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. यावेळी तो लीगचे नेतृत्व करताना दिसेल. पण कर्णधार रोहित शर्माने केएल राहुलवर जास्त विश्वास दाखवला, म्हणूनच राहुल सतत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे आणि ऋषभ पंत बाहेर बसला आहे.

अर्शदीप सिंगलाही मिळाली नाही संधी 

अर्शदीप सिंगबद्दल बोलायचे झाले तर, तोही संघात आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने फक्त तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली होती. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा. हर्षित राणा या स्पर्धेत आधी नव्हता, पण जेव्हा जसप्रीत बुमराह खेळू शकणार नाही अशी बातमी आली, तेव्हा त्याला घाईघाईने संघात समाविष्ट करण्यात आले. आतापर्यंत मोहम्मद शमी आणि हर्षित राणा खेळत आहेत, पण अर्शदीप त्याचा पहिला सामना खेळण्यास उत्सुक आहे. आता तो शेवटचा सामनाही खेळू शकेल अशी आशा कमी आहे.

वॉशिंग्टन सुंदर अजूनही बाहेर 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात पाच फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला  आहे. यापैकी चार जण खेळत आहेत, परंतु वॉशिंग्टन सुंदरला अद्याप संधी देण्यात आलेली नाही. 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर टीम इंडिया फायनल खेळेल. तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा 4 स्पिनर्स असतील हे निश्चित दिसते, परंतु वॉशिंग्टन सुंदरचे नाव त्यात असेल की नाही हे सांगणे कठीण आहे. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे शानदार गोलंदाजी करत आहेत, त्यामुळे सुंदरसाठी अंतिम अकरा जणांमध्ये स्थान मिळवणे सोपे काम नसेल.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात

व्हिडीओ

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
Embed widget