एक्स्प्लोर

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला बदल करावे लागणार : सौरव गांगुली

T20 World Cup 2021: गांगुलीचा असा विश्वास आहे की टीम इंडिया या वर्षी टी -20 विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाला परिपक्वतेसह खेळावे लागेल.

T20 World Cup 2021: युएई (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) आजपासून टी -20 विश्वचषक (T20 World Cup 2021) सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयाबाबत मोठे विधान केले आहे. गांगुलीचा असा विश्वास आहे की कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडिया या वर्षी या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते. त्याने असेही म्हटले की इतकी प्रतिभा असूनही संघाला ही ट्रॉफी जिंकण्यासाठी परिपक्वतेसह आपला खेळ खेळावा लागेल.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली शनिवारी म्हणाले, की "तुम्ही इतक्या सहजपणे चॅम्पियन होत नाही. केवळ स्पर्धेत भाग घेतला म्हणजे विजेता होता येत नाही, त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागेल. स्पर्धेत परिपक्वतेने खेळण्याची गरज आहे. " त्याचवेळी ते म्हणाले, "तुम्ही टीम इंडियावर नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की इथं खूप जागतिक दर्जाची प्रतिभा आहे. या खेळाडूंमध्ये कोणत्याही स्तरावर खेळताना धावा आणि विकेट घेण्याची क्षमता असते. हा विश्वचषक जिंकण्यासाठी त्यांना फक्त मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. ”

एका वेळी एका खेळावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
दादा म्हणून प्रसिद्ध असलेले गांगुली म्हणाले की, "टीम इंडियाने सुरुवातीपासूनच जेतेपदाचा विचार करू नये, तर एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अंतिम फेरी गाठल्यावरच तुम्ही विजेतेपद जिंकता. यासाठी तुम्हाला लीग फेरीत भरपूर क्रिकेट खेळावे लागेल. म्हणूनच माझा विश्वास आहे की सध्या टीम इंडियाने एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

पुढील वर्षी भारतात आयपीएलचे आयोजन अपेक्षित आहे
सौरव गांगुली यांनीही पुढील वर्षी आयपीएल भारतातच खेळण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "आयपीएल ही आमची स्पर्धा आहे आणि मला मनापासून आशा आहे की पुढच्या वर्षी ती पुन्हा एकदा भारतात खेळली जाईल. दुबईत स्पर्धेदरम्यान खूप छान वातावरण पहायला मिळालं असेल. पण भारतात आयपीएलची आवड खूप वेगळी आहे. आम्हाला पुन्हा एकदा भारतात स्पर्धा आयोजित झालेलं पहायचं आहे.

मला मनापासून आशा आहे की पुढील सात ते आठ महिन्यांत भारतातील कोविड -19 साथीची परिस्थिती सामान्य होईल आणि आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आयपीएल सामने आयोजित करू शकू.

आयपीएलची सुरुवात यावर्षी भारतात झाली होती. मात्र, कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान, बायो बबलमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर त्याचा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला गेला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Embed widget