Rising Stars Asia Cup 2025: राइजिंग स्टार्स आशिया कपसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा; IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, पाहा 15 खेळाडूंची यादी
Rising Stars Asia Cup 2025: बीसीसीआयने राइजिंग स्टार्स आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय ‘ए’ संघाची घोषणा केली आहे.

Rising Stars Asia Cup 2025: बीसीसीआयने (BCCI) अखेर राइजिंग स्टार्स आशिया कप 2025 (Rising Star Asia Cup) स्पर्धेसाठी भारतीय ‘ए’ (Team India A) संघाची घोषणा केली आहे. वरिष्ठ पुरुष निवड समितीने 15 सदस्यीय संघ निश्चित केला असून ही स्पर्धा 14 ते 23 नोव्हेंबरदरम्यान कतारच्या दोहा येथे पार पडणार आहे. सर्व सामने वेस्ट इंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दोहा येथे खेळले जातील. या संघाचे नेतृत्व जितेश शर्मा करणार असून तो संघाचा कर्णधार तसेच मुख्य विकेटकीपर असेल. त्याचा उपकर्णधार नमन धीर असेल. निवडकर्त्यांनी मुख्य संघासोबत पाच खेळाडूंना स्टँडबायवर ठेवले आहे.
या नव्या संघात बहुतांश तरुण आणि उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले फक्त दोन खेळाडू कर्णधार जितेश शर्मा आणि अष्टपैलू रमनदीप सिंग आहेत. उर्वरित सर्व खेळाडू प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
Rising Stars Asia Cup 2025: 15 सदस्यीय भारतीय ‘ए’ संघ खालीलप्रमाणे:
प्रियांश आर्या
वैभव सूर्यवंशी
नेहल वढेरा
नमन धीर (उपकर्णधार)
सूर्यांश शेडगे
जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर)
रमनदीप सिंग
हर्ष दुबे
आशुतोष शर्मा
यश ठाकूर
गुरजपनीत सिंग
विजय कुमार वैश्य
युद्धवीर सिंग चरक
अभिषेक पोरेल (विकेटकीपर)
सुयश शर्मा
स्टँडबाय खेळाडू:
गुरनूर सिंग बराड, कुमार कुशाग्र, तनुष कोटियान, समीर रिझवी आणि शेक रशीद.
Rising Stars Asia Cup 2025: स्पर्धेचे स्वरूप आणि गटरचना
भारतीय ‘ए’ संघाला ग्रुप बी मध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये ओमान, यूएई आणि पाकिस्तान ‘ए’ हे संघ सहभागी असतील.
या स्पर्धेत आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांचे ‘ए’ संघ तसेच सहयोगी राष्ट्रांचे मुख्य संघ खेळणार आहेत.
सहभागी देश खालीलप्रमाणे
भारत ‘ए’
पाकिस्तान ‘ए’
श्रीलंका ‘ए’
बांगलादेश ‘ए’
अफगाणिस्तान ‘ए’
ओमान
यूएई
नेपाळ
Asia Cup 2025: एशिया कप 2025 च्या ट्रॉफीवर वाद कायम
दरम्यान, भारतीय संघाने एशियन क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष आहेत आणि पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत, जे भारताच्या विरोधात वक्तव्ये करत असतात. एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, परंतु भारताला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही कारण ती एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांच्या ताब्यात आहे.
आणखी वाचा




















