एक्स्प्लोर

Virat Kohli : रोहित शर्मापासून पाँटिंगच्या शतकांपर्यंत, विराट कोहलीनं मोडले अनेक विक्रम

Asia Cup 2022, Virat Kohli : किंग विराट कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.

Asia Cup 2022, Virat Kohli : किंग विराट कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. त्यानं 61 चेंडूंत 12 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी उभारली.  विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारतानं अफगाणिस्तानचा 101धावांनी पराभव केला. या शतकी खेळीसह विराट कोहलीनं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पाहूयात विराट कोहलीनं केलेले विक्रम... 

रोहित-राहुलचा विक्रम मोडला - 
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी करत राहुल आणि रोहित यांचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं रोहित शर्माचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर आता सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम झाला आहे. विराट कोहलीनं 122 धावांची खेळी केली आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्मानं 118 धावांची खेळी केली होती.  राहुलच्या 110 धावांच्या शतकी खेळीचा विक्रमही विराट कोहलीनं मोडीत काढला आहे. विराट कोहलीच्या नावावर भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम झालाय. 

मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडला -  
विराट कोहलीनं वादळी शतक झळकावत अनेक विक्रमांना गवसणी घातली. विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  विराट कोहलीनं मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढला आहे. मार्निट गप्टिलच्या नावावर 3500 धावा आहेत. विराट कोहलीच्या नावावर 3584 धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माच्या नावावर 3620 धावा आहेत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+  धावा करणारा फलंदाज - 
माजी कर्णधार विराट कोहलीनं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीनं रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीनं 33 व्यांदा 50+  पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहित शर्मानं आतापर्यंत 32 वेळा 50+  जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात विराट कोहलीनं तीनवेळा 50+  पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आशिया चषकात विराट कोहलीनं भारताकडून सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रम केलाय. 

24 हजार धावांचा विक्रम -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं सर्वात वेगवान 24 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.  याआधी सचिन तेंडुलकरने वेगवान 24 हजार धावांचा विक्रम केला होता. 

भारताकडून शतक झळकावणारे फलंदाज - 
टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली सहावा फलंदाज ठरलाय. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक झळकावली आहेत. रोहित शर्मानं टी 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक चार शतकं झळकावली आहेत. त्यानंतर राहुलच्या नावावर दोन शतकं आहेत.

आशिया चषकात सर्वाधिक धावा - 
यंदा भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीनं दोन अर्धशतक आणि एक शतक झळकावत यंदा आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय, 2012, 2016 मध्येही विराट कोहलीनं भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या होत्या.  
 
पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. विराट कोहलीनं पाँटिंगच्या 71 शतकांची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर 71 शतकांची नोंद आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget