एक्स्प्लोर

बांगलादेशपासून भारताला हे 5 धोके

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. बांगलादेशला भारताच्या तुलनेत कमकुवत समजलं जात असलं तरी जुने अनुभव पाहता टीम इंडियाचे शिलेदार ही चूक करणार नाहीत. बांगलादेशने अनेकदा कुणी अंदाजही लावला नसेल, अशा परिस्थितीत बलाढ्य संघांना हरवलेलं आहे. बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बांगलादेशपासून असलेल्या धोक्यांपासून टीम इंडियाचा सावध राहण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशपासून भारताला काय धोके? 1. भारतावर 2-1 ने मालिका विजय बांगलादेशने भारताला 2007 सालच्या विश्वचषकात धूळ चारली होती. भारतासाठी हा पराभव धक्कादायक होता. असाच पराभवाचा धक्का बांगलादेशने भारताला अनेकदा दिला आहे. 2015 मध्ये झालेल्या वन डे मालिकेत बांगलादेशने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता. एवढंच नाही तर 2016 च्या टी-20 विश्वचषकात भारताची पराभवाची परिस्थिती झाली होती. मात्र महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीने भारताने हा सामना वाचवला. 2. सलामीवीर जोडीवर मदार चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या सलामीवीर जोडीने चांगली भागीदारी रचली असली तरी पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची संख्या फारच कमी आहे. भारताने गेल्या तीन सामन्यात पहिल्या 10 षटकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध 46, श्रीलंकेविरुद्ध 48, श्रीलंकेविरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 35 धावा केल्या आहेत. 3. खराब क्षेत्ररक्षण भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचं तिकीट बूक केलं असलं तरी क्षेत्ररक्षण सुधारणं भारतासाठी महत्वाचं असणार आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये युवराज सिंह, केदार जाधव, रोहित शर्मा यांच्यासारख्या भरोशाच्या खेळाडूंकडून अनेक चुका झालेलं दिसून आलं. पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात केदार जाधवने दोन झेल सोडले, हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरुद्ध कुशल मेंडिस आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाशिम आमलाचा झेल सोडला. 4. तमीम इकबालचा धोका बांगलादेशचा स्फोटक फलंदाज तमीम इकबालला लवकरात लवकर माघारी पाठवण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तमीम अपयशी ठरला असला तरी त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्याने बांगलादेशसाठी मोलाची भूमिका निभावली आहे. तमीमने इंग्लंडविरुद्ध 128, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 95 धावांची शानदार खेळी केली आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्या नावावर 223 धावा आहेत. 5. मुस्तफिजुर रहमानपासून सावधान! भारतीय फलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली असली तरीही बांगलादेशच्या गोलंदाजांपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण मुस्तफिजुर रहमान हा बांगलादेशचं खरं अस्त्र आहे. कारण त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. तर रुबल हुस्सेनने गेल्या 4 सामन्यात दोन वेळा विराट कोहलीला माघारी पाठवलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या; पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget