एक्स्प्लोर

Yavatmal: बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत घोटाळा; चुकीच्या खात्यात कर्ज वाटप केल्याने बँक अधिकाऱ्यांकडून 97 कोटी वसुलीचे आदेश

Maharashtra News: यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील काही मंडळींनी चुकीच्या खात्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले, त्याचा परिणाम आता त्यांना भोगावा लागतोय.

Yavatmal: एखाद्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळ किंवा अधिकाऱ्यांनी चुकीचे कर्ज वाटप करून बँकेला आर्थिक अडचणीत आणलं, तर त्यांच्याकडून छोटी मोठी रक्कम वसूल केल्याचे प्रकरण आपण अनेकदा ऐकतो. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या प्रकरणात तत्कालीन अध्यक्षा विद्या केळकर यांच्याकडून तब्बल 55 कोटी, तर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन यांच्याकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय इतर 7 संचालक आणि 7 अधिकाऱ्यांकडून 17 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश अप्पर निबंधक पुणे शैलेश कोतमिरे यांनी दिले आहेत. चुकीचे कर्ज वाटप करून बँकेला शेकडो कोटी रुपयांच्या NPA च्या फेऱ्यात अडकवल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँक 1994-95 मध्ये स्थापन झाली होती. 2013 वर्षापर्यंत ही बँक नीट चालत होती. मात्र, 2013 पासून बँकेच्या संचालक मंडळामधील काही लोकांनी 267 कोटी 40 लाख रुपयांचं चुकीचे कर्ज वाटप करणं सुरू केलं. मात्र, ज्यांना कर्ज दिलं त्या कर्जदारांनी ही रक्कम कधीच भरली नाही, त्यामुळे या रकमेवरील व्याज 208 कोटी 13 लाखांपर्यंत गेलं आणि मुद्दल व्याज मिळून ही रक्कम 475 कोटी झाली आहे. 

सहकारी संस्थेचे (पुणे) अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांच्याकडून अध्यक्षांसह 7 संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 7 अधिकाऱ्यांवरील वसुली निर्देशामुळे बँकेच्या ठेवीदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकांनी आपला घामाचा, सेवानिवृत्तीचा पैसा बँकेत डिपॉझिट केला आहे, त्यामुळे ही रक्कम मिळावी, अशी ठेवीदारांची अपेक्षा आहे. मात्र, हे निर्देश केवळ आदेशापुरते मर्यादित न राहता याची अंमलबजावणी होऊन ठेवीदारांची रक्कम परत मिळाली पाहिजे, अशी मागणी ठेवीदार करत आहेत.

यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून (RBI) 9 नोव्हेंबर 2022 मध्ये रद्द झाला. 11 नोव्हेंबर 2022 रोजी अवसायक म्हणून जिल्हा उपनिबंधक यांची नियुक्ती करण्यात आली. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (DICJC) 300 कोटींचा क्लेम मंजूर करण्यात आला. बँकेला ठेवीदारांचे 185 कोटी 36 हजार 500 रुपये देणे बाकी आहे. 

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेने अधिकाऱ्यांकडून 31 मार्च 2023 पर्यंत 16 कोटी 33 लाखांची वसुली केली आहे. तर, पुणे अपर निबंधक शैलेश कोतमिरे यांनी अधिकाऱ्यांकडून जून 2023 पर्यंत 97 कोटी वसूल करण्याचे आदेश बँकेला दिले आहेत.

हेही बातमी:

Tejaswini Reddy Murder Case: वर्षभरापूर्वीच 'ती' हैदराबादहून लंडनला शिकायला गेली; रुममेटने केली चाकू भोसकून हत्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा
Uddhav Thackeray : 'मतचोरीचा लाभ कोणी घेतला? मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा'- ठाकरे
Uddhav Thackeray : 'कुटुंबियांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता का?', गंभीर आरोप
Pune Gang War: 'आंदेकर टोळी अजूनही सक्रिय', गणेश काळेच्या हत्येने पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान!
Pandharpur Yatra: मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी यात्रेडे भाविकांनी फिरवली पाठ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Raj Thackeray : मलबार हिलमध्ये कल्याण ग्रामीण, भिवंडीसह मुरबाडच्या 4500 जणांच मतदान, दुबार मतदारांच्या संख्येचा पाढा वाचला, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मतदार यादीवर काम करा, दुबार तिबार सापडल्यास फोडून काढा,पोलिसांच्या ताब्यात द्या : राज ठाकरे
MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget