एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या चिठ्ठीवरुन पाकिस्तानचा खोटारडेपणा

भारताने चिठ्ठी लिहिली आहे, मात्र त्यातील मजकूर तसा नाही. जो दावा पाकिस्तान करत आहे, ती त्यांची इच्छा असावी, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

इस्लामाबाद: खोटं बोलण्यात पटाईत असणाऱ्या पाकिस्तानने इम्रान खान पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतरही आपला खोटारडेपणा कायम ठेवला आहे. पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दावा केला आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिठ्ठी लिहून दोन्ही देशांतील संवाद सुरु करण्याचे संकेत दिले. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. भारताने चिठ्ठी लिहिली आहे, मात्र त्यातील मजकूर तसा नाही. जो दावा पाकिस्तान करत आहे, ती त्यांची इच्छा असावी, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. दहशवादी कारवायांमुळे संवाद नाही एकीकडे पाकिस्तान म्हणतंय की भारताने बातचीत करण्याबाबत म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत बातचीत शक्य नाही, अशी भारताची भूमिका आहे.  पाकिस्तानने काश्मीर राग आळवला दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पुन्हा काश्मीर राग आळवला. दोन्ही देशातील मुद्द्यांमध्ये काश्मीर एक सत्य आहे . त्यावर तोडगा निघणं आवश्यक आहे, असं कुरेशी म्हणाले. काश्मीर मुद्द्यावरुन कुरेश यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला. वाजपेयींनी लाहोर आणि इस्लामाबादचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानबाहेरच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवली होती. तसंच चर्चेशिवाय पर्याय नसल्याचं नमूद केलं होतं, असं कुरेशींनी सांगितलं. पंतप्रधान इम्रान खान यांचाही काश्मीर राग इम्रान खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात भारत आणि अफगाणिस्तानवर अप्रत्यक्ष भाष्य केलं होतं. शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल, असं इम्रान खान म्हणाले होते. संबंध सुधारण्यासाठी शांतीची गरज आहे. भारताने एक पाऊल टाकल्यास आम्ही दोन पावलं टाकू, असं इम्रान खान म्हणाले. त्याचवेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये काश्मीर हा एक मुद्दा आहे असंही नमूद केलं होतं. आधी पंतप्रधान आणि आता परराष्ट्रमंत्री पाकिस्तानचे दोन्ही महत्त्वाचे नेते काश्मीर मुद्दा उपस्थित करत आहेत. म्हणजेच पाकिस्तानला भारताची चर्चा तर करायची आहे, मात्र काश्मीरचा मुद्दा समोर ठेवूनच. त्यामुळे ही चर्चा होते की नाही ते येणारा काळच ठरवेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला

व्हिडीओ

Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
Ranveer Singh Deepika Padukone: आठ तासांपेक्षा जास्त काम करायला दीपिका पादुकोणची ना; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
दीपिका पादुकोण म्हणते, 'आठच तासांची शिफ्ट...'; आता तिचा नवरा रणवीर सिंहच म्हणतोय; 'कर लो ना थोड़ी ज्यादा शूटिंग...'
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Embed widget