एक्स्प्लोर

एका आठवड्यात भारतीय सैन्याला देशाबाहेर काढणार; मालदीवच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य

India Maldives : राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय सैन्याला एका आठवड्यात देश सोडून जावे लागणार असल्याचे मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी म्हटले.

नवी दिल्ली भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या मालदीवमध्ये (Maldives) झालेले सत्तांतर आता अडचणीचे होण्याची शक्यता आहे. मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Maldives president-elect Mohamed Muizzu) यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मालदीवमधून भारतीय लष्कर हटवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले आहे. मुइझू हे चीन समर्थक समजले जातात. त्यांनी 'अल जझीरा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच ते भारतीय सैन्याला मालदीवमधून माघार घेण्याची विनंती करणार आहेत. हे काम प्राधान्य कामातील पहिले काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू हे भारतीय सैन्याला द्वीपसमूहातून बाहेर काढण्याच्या त्यांच्या निवडणुकीतील आश्वासनावर ठाम आहेत. पण ते म्हणाले की ते मुत्सद्दी मार्गाने या समस्येचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुइझू पुढील महिन्यात, 17 नोव्हेंबर रोजी औपचारिकपणे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांना आशा आहे की जर शक्य असेल तर ते त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात भारतीय सैन्य माघार घेण्यास सांगतील. 

मुलाखतीत  नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी म्हटले की,  मी काही दिवसांपूर्वी भारतीय उच्चायुक्तांना भेटलो होतो आणि त्या भेटीदरम्यानच मी म्हणालो होतो की या समस्येला आमचे सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांनी ते सकारात्मकपणे घेतले आणि पुढे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी ते आमच्यासोबत काम करतील असे सांगितले.

मालदीवमध्ये परदेशी सैन्याची आवश्यकता नाही 

मोहम्मद मुइझू यांनी म्हटले की, “आम्ही शतकानुशतके शांतताप्रिय देश आहोत. आमच्या भूमीवर परकीय सैन्य कधीच नव्हते. आमच्याकडे कोणतीही मोठी लष्करी पायाभूत सुविधा नाही आणि आमच्या भूमीवर कोणत्याही परदेशी सैन्याच्या उपस्थितीने आम्हाला सुरक्षित वाटत नाही.

त्यांचे परराष्ट्र धोरण चीनकडे झुकणार का, असे विचारले असता मुइझू म्हणाले की ते मालदीव समर्थक धोरणाचे पालन करतील. आमच्या देशाचे हित सर्वप्रथम पाहिले जाईल. आम्ही कोणत्याही देशाला खूश करण्यासाठी पक्षपाती भूमिका घेणार नाही. आमचे हित आधी जपले जावे अशी आमची इच्छा आहे. जो देश आमचा आदर करेल तो आमचा चांगला मित्र असेल असेही त्यांनी म्हटले. 

भारतासाठी मालदीव महत्त्वाचा

भारताच्या लक्षद्वीपपासून मालदीव 700 किलोमीटर अंतरावर असून, भारतीय भूभागापासून 1200 किलोमीटर अंतरावर आहे. या देशाशी अधिकाधिक चांगले संबंध ठेवणे भारतासाठी आवश्यक आहे. अन्यथा, तेथील चीनची वाढती उपस्थिती भारताच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरू शकते.  गेली सहा दशके भारत आणि मालदीवचे राजनैतिक संबंध आहेत. भारताने सामाजिक व आर्थिक विकास, देश उभारणी आणि सागरी सुरक्षितता अशा अनेक क्षेत्रांत वेळोवेळी मालदीवला भरीव मदत केली आहे.

इतर महत्त्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
Ethanol :  आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
Ethanol :  आता विमाने इथेनॉलवर उड्डाण करणार, जुन्या जेट इंधनावरील अवलंबित्व कमी होणार
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले
Hindustani Bhau Warns Uddhav Thackeray: 7 तारखेला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
7 सप्टेंबरला ठाकरेंचे 15 आमदार जाणार, हिंदुस्थानी भाऊचा खळबळजनक दावा, तर 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत संजय राऊतांना टोला
Pune Ashadhi Wari 2026: माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
माऊलींच्या पालखीसाठी पुण्यात आलेल्या वारकऱ्यांचे हाल, शाळांमधील खोल्या अपुऱ्या, पिण्याचं पाणीही नाही, छतांना गळती
Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: 'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
'मासिक पाळी आलेली, वॉशरुमलाही जाणं शक्य नव्हतं'; मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 9 तास अडकलेल्या मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग
Tukaram Mundhe News: तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
तुम्हाला नायक सिनेमासारखं एका दिवसासाठी CM बनवल्यास काय कराल?; तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Embed widget