एक्स्प्लोर

India-Canada Tensions : भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेणार? परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

India-Canada Visa : भारत आणि कॅनडा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. खलिस्तानच्या मुद्द्यावरून तणावामुळे भारताने कॅनडावर व्हिसा बंदी लागू केली होती.

India-Canada Relations : भारत (India) कॅनडा (Canada) वरील व्हिसा (Visa) बंदी लागू घेऊ शकते, असे संकेत परराष्ट्र मंत्र्यांनी (Minister of External Affairs of India) दिले आहेत. भारताच्या कॅनडातील राजदूतांच्या सुरक्षेत प्रगती दिसून आली आणि त्यांच्या सुरक्षेची हमी मिळाल्यास भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेऊ शकते, असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, भारतातून कॅनडाची व्हिसा सेवा (Canada Visa Service) काही आठवड्यांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली. कॅनडातील भारतीय मुत्सद्दींच्या सुरक्षेची चिंता हे यामागचं मूळ कारण होतं. कॅनडा राजनयिकांसाठी सुरक्षित वातावरण देऊ शकला नाही, हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन आहे, असंही जयशंकर यांनी (Minister of External Affairs of India S. Jaishankar) म्हटलं.

भारत कॅनडावरील व्हिसा बंदी मागे घेणार?

खलिस्तानच्या मुद्दा तापल्याने भारताने कॅनडावर व्हिसा बंदी लागू केली होती. भारत आणि कॅनडा दोन्ही देशामध्ये सध्या तणावपूर्ण संबंध आहेत. खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) हरदीपसिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला. भारताने हरदीपसिंह निज्जरच्या हत्येचे आरोप फेटाळले. पण, कॅनडातील भारताच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांना ओटावा सोडण्यास सांगितलं. यानंतर, भारताने कॅनडाला झटका देत कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्ली सोडण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवाही बंद करण्यात आली होती.

परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, कॅनडातील आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत प्रगती झाल्याचे दिसल्यास आम्ही व्हिसा सेवा सुरू करण्याचा विचार करू. मला आशा आहे की, हे लवकरच होईल.  काही आठवड्यांपूर्वी भारताने कॅनडात व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवली होती. याचं कारण म्हणजे कॅनडामधील आमचे मुत्सदी सुरक्षित नव्हते. त्यांच्या सुरक्षिततेची बाब लक्षात घेत आम्हाला व्हिसा सेवा तात्पुरती बंद करावी लागली.

परराष्ट्र मंत्री नेमकं काय म्हणाले?

कॅनडातील भारतीय मुत्सदींच्या सुरक्षेची स्थिती सुधारेल, अशी आशा परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. सुरक्षेत सुधारणा झाल्यास मुत्सद्दींना आत्मविश्वासाने काम करणं शक्य होईल, असंही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलं आहे. मुत्सदींची सुरक्षा सुनिश्चित करणे ही व्हिएन्ना करारातील सर्वात मूलभूत बाब आहे. सध्या कॅनडामध्ये अशी अनेक आव्हाने आहेत, ज्यामुळे आमचे लोक सुरक्षित नाहीत. आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची सुरक्षाही धोक्यात आहे. राजनयिकांच्या सुरक्षेत प्रगती होताच व्हिसा सेवा सुरू होईल, असं जयशंकर यांनी सांगितलं.

कॅनडाच्या 41 मुत्सद्दींना बाहेरचा रस्ता

भारतीय मुत्सदीना कॅनडातून माघारी धाडल्यानंतर भारतानेही कॅनडाच्या मुत्सदींना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे अलिकडेच कॅनडाचे 41 मुत्सद्दी भारत सोडून गेले आहेत. त्यांना नवी दिल्ली सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की, व्हिएन्ना कराराद्वारे मुत्सद्दींच्या संख्येत समानता हा एक संबंधित आंतरराष्ट्रीय नियम आहे. एका देशात किती मुत्सद्दी असावेत यावर, हे संपूर्ण प्रकरण आधारित आहे. ही एक प्रणाली दोन्ही देशांना एकसारखी लागू होते. आम्ही कॅनडाला संख्या समान ठेवण्यास सांगितलं कारण त्यांचे अधिकारी हस्तक्षेप करत होते.

महत्वाच्या इतर बातम्या :

India-Canada : भारतानं फटकारल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान नरमले! आता म्हणतायत, भारतासोबत संबंध महत्वाचे

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget