एक्स्प्लोर

अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'

नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील सलग स्फोटांनी दोन्ही देशांमधील तणावाचा भडका उडवला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, दहशतवाद पुन्हा एकदा राजनैतिक हत्यार बनला आहे.

अवघ्या 24 तासांच्या अंतराने दक्षिण आशियातील दोन प्रमुख राजधानी शहरांवर भीषण स्फोटांनी दहशतीचे सावट आणले आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली आणि पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या दोन्ही शहरांतील हल्ल्यांनी केवळ स्थानिक सुरक्षेचा प्रश्न नव्हे, तर भूराजकीय अस्थिरतेचे गंभीर संकेत पुन्हा एकदा दिले आहेत.

दिल्लीतील हल्ला : लाल किल्ल्याजवळ स्फोट

सोमवारी 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला. सिग्नलवर थांबलेल्या एका वाहनात अचानक झालेल्या स्फोटामुळे आजूबाजूच्या सहा गाड्या आणि तीन ऑटोरिक्षांना आग लागली. या स्फोटात किमान 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी कायदा (UAPA) आणि स्फोटक पदार्थ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, स्फोट अपघाती नसून “पूर्वनियोजित आणि हेतुपूर्वक घडवलेली घटना” असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आत्मघाती स्फोट

या स्फोटानंतर अवघ्या एका दिवसात, 11 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील जिल्हा न्यायालयाबाहेर आत्मघाती हल्ला झाला. दुपारच्या सुमारास न्यायालयीन संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिस वाहनाजवळ हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. या हल्ल्यात किमान 12 जण ठार आणि 27 जखमी झाले. मृतांमध्ये अनेक पादचारी आणि न्यायालयीन कामासाठी आलेले नागरिक होते. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी हा आत्मघाती हल्ला असल्याचे पुष्टी केली.

तोपर्यंत दक्षिण आशियात शांतता येऊच शकत नाही

दरम्यान, या दोन्ही हल्ल्यानंतर पाकिस्तानी पत्रकारानं केलेल्या ट्विटनं भूवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दीकी  (Taha Siddiqui on India and Pakistan Blast) यांनी पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप केला आहे. सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गेल्या 24 तासांत दहशतवादाने दिल्ली आणि इस्लामाबाद दोन्ही शहरांना हादरवलं आहे. दोन्ही ठिकाणी आत्मघाती हल्लेखोरांनी स्फोट घडवले आणि पाकिस्तानी लष्कर ज्यांना आपली मालमत्ता म्हणते, तेच या हल्ल्यांमागे आहेत. जोपर्यंत पाकिस्तानी जनरल इस्लामी दहशतवादाचा वापर आपल्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या हत्यार म्हणून करत राहतील, तोपर्यंत दक्षिण आशियात शांतता येऊच शकत नाही! सिद्दीकी यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला 

दुसरीकडे दिल्लीत झालेल्या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेश आणि मुंबईत हाय अलर्ट देण्यात आला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही कडेकोट तपासणी सुरु आहे. तिकडं पाकिस्तानात हल्ल्यानंतर कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारली नसली, तरी अशा प्रकारच्या हल्ल्यांमागे पाकिस्तान तालिबान (TTP) चा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पाकिस्तानने थेट भारत आणि अफगाणिस्तानवर आरोप करत हा भारत पुरस्कृत दहशतवादाचा नमुना असल्याचा आरोप केला. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या षड्यंत्रांचा जागतिक स्तरावर निषेध करण्याचे आवाहन केले. तथापि, त्यांच्या आरोपाला कोणताही ठोस पुरावा सादर केला नाही. 

पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला

इस्लामाबाद स्फोटानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान युद्धाच्या स्थितीत असल्याचे म्हटले आणि हा हल्ला जागे होण्याची सूचना असल्याचे म्हटले. पाकिस्तानने अफगाण तालिबान सरकारवर TTP दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा थेट आरोप केला आहे.

दक्षिण आशियात वाढत्या दहशतीचे सावट

नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील सलग स्फोटांनी दोन्ही देशांमधील तणावाचा भडका उडवला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, दहशतवाद पुन्हा एकदा राजनैतिक हत्यार बनला आहे. विश्लेषकांच्या मते, जर या घटनांच्या मागील सूत्रांची पारदर्शक चौकशी न झाल्यास  दक्षिण आशियात स्थैर्य आणि विश्वास दोन्ही धोक्यात येऊ शकतात.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UAE Missile Alert : क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट 
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget