एक्स्प्लोर
Advertisement
लाल किल्ल्यावरुन मोदींचं भाषण, बलुचिस्तानात वाहवा !
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची बलुचिस्तानात प्रशंसा होत आहे. बलोच रिपब्लिकन पक्षाचे नेते अशरफ शेरजान यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
"आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. त्यांनी बलुचिस्तानचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला आहे." असं शेरजान यांनी म्हटलं आहे.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांनी बलुचिस्तानसोबत गिलगितचा उल्लेखही केला आहे. त्यामुळे तेथील लोकांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आपलं समर्थन दर्शवलं आहे.
पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत काश्मीरविषयक मुद्द्यावर हल्लाबोल केला होता. काश्मीर ही समस्या नाही, तर पाकव्याप्त काश्मीर ही समस्या आहे. मात्र पाकव्याप्त काश्मीर हा भागही भारताचाच आहे, असं मोदींनी ठणकावून सांगितलं होतं.
मोदींनी आज आपल्या त्याच वक्तव्याचा लाल किल्ल्यावरून पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदींनी पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा उचलून धरल्यानंतर बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी आंदोलन सुरू झालं आहे. तसंच काही राजकिय पक्षांनी मोदींच्या भूमिकेला समर्थनही दिलं आहे.
संबंधित बातम्या :
पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचाच भाग, मोदींनी...
खुद्द पाकिस्तानातच पाकविरोधी घोषणाबाजी !
पाकिस्तानच्या क्वेटातील रुग्णालयात बॉम्बस्फोट,...
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement