एक्स्प्लोर

 Wardha News : वर्ध्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार थेट बांधावर

 Wardha News : वर्ध्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा हिंगणागावाला बसला आहे.

 Wardha News : वर्ध्यात (Wardha) झालेल्या मुसळधार पावसाने (Rain) शेकडो हेक्टरवरील पिकं खरडून गेली आहेत. तर शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे. बांधावर पोहचून त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांशी (Farmer) देखील संवाद साधला आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 नदी काठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून देखील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, तब्बल 13 हजार 932 हेकटर शेती क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले.

अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका

वर्धा, यशोदा, वणा, बोर आणि धाम या नद्या मुसळधार पावसामुळे दुधडी भरुन वाहत आहेत. तर यशोदा आणि वर्धा नदी काठावरील शेती पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. जवळपास पाचशे बारा गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक फटका हिंगणाघाटाला बसला आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली, कुंभी, अलमडोह, पिंपळगाव, वाळदुर, मणसावळी, सेलू तालुक्यातील कोटंबा, कोलगाव, येळाकेळी,  सरुळ या गावांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

मागील चार दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास  1659 हेक्टर इतक्या क्षेत्रात नुकसान झाले आहे. पण मागील 48 तासांत झालेल्या पावासामुळे यामध्ये आणखी भर पडल्याचं चित्र आहे. सध्या जिल्ह्यात  13 हजार 932 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पुराचा सर्वधिक फटका हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू आणि देवळी तालुक्याला बसला आहे.

आधीच राज्यात मान्सूनने उशीरा हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. त्यातच आता झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी संकट कोसळले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकरी देखील करत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची शेती देखील खरडून गेली आहे. देवळी तालुक्यातील काही भागात खासदार रामदास तडस यांनी पाहणी केली. तसेच शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीसाठीचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं खासदार तडस यांनी सांगितले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद; शेकडो हेक्टरला नुकसानीचा फटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Devendra Fadnavis BMC Election 2026: राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Embed widget