एक्स्प्लोर

Devendra Fadnavis BMC Election 2026: राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Thackeray Brothers: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापवणाऱ्या ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. मी नागपूरमधून आलो आहे, मी काही पाकिस्तानमधून आलेलो नाही.

Devendra Fadnavis on Thackeray Brothers: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आतापर्यंत कितीवेळा मुंबईबाहेर गेले आहेत. त्यांचा जीव फक्त मुंबईतच अडकला आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका (BMC Election 2026) काबीज करुन भ्रष्टाचार करायचा आहे, अशी घणघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ते बुधवारी 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपचे (BJP) उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर टीका केली जाते. मात्र, उद्धव ठाकरे स्वत: विधानपरिषदेत बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही कुठे गेली होती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ठाकरे बंधूंकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या मराठीच्या मुद्द्याबाबतही भाष्य केले. जर ते मराठी असतील, तर मी काय उत्तर प्रदेशातून आलो आहे का? विधानसभा निवडणुकीत भाजप हा मुंबईत 15 ते 16 जागा जिंकणारा पक्ष आहे. आम्हाला मराठी लोकांची साथ नसती तर आम्ही या जागा जिंकू शकलो असतो का? मी नागपूरमधून आलो आहे, मी काही पाकिस्तानमधून आलेलो नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. राज आणि उद्धव ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्दल इतका आकस का आहे? सगळ्या हिंदूंनी एकत्र राहिले पाहिजे. मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र लढायला तयार आहोत. पण अन्य राज्यांमधील लोकांना मारहाण करण्याचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा कठोर इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

वारिस पठाण यांनी बुरखेवाली महापौर होईल, असे म्हटले तेव्हा ठाकरे बंधूंच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. हे सगळे व्होटबँकेचे राजकारण आहे. सगळेजण एकत्र मिळून हे करत आहेत. कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य केले तेव्हा ठाकरे गट लगेच तुटून पडला. पण 'बुरखेवाली महापौर' या विषयावर ठाकरे गट काहीच बोलला नाही. आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. पुढील पाच वर्षांमध्ये मुंबईतील विकासकामांसाठी 17 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्रात आणि मुंबईत फक्त एकच ब्रँड आहे, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही ब्रँड नाही, बाळासाहेबांचा ब्रँड एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते. प्रत्येक निवडणुकीत एक पिढी तयार होते. मात्र, या निवडणुकीत दोन पिढ्या एकत्र रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर बंडखोरी झाली असली तरी बंडखोर शांत झाले आहेत, फडणवीस यांनी सांगितले.

तसेच मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा काहीही फायदा होणार नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केला. आम्ही यंदाच्या निवडणुकीत एकाच घरातील लोकांना उमेदवारी दिलेली नाही. आम्ही मुंबईच्या निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यापैकी कोणालाही प्रचारासाठी आणलेले नाही. आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत कोणालाही आणायची गरज नाही. पंतप्रधान मोदी यांचं फक्त नाव पुरेसं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

आणखी वाचा

मोठी बातमी: काँग्रेस अन् MIM सोबत युती खपवून घेणार नाही; नेत्यांवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीस संतापले, काय काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Rajkumar Badole: अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णयावरून माजी सामाजिक न्यायमंत्र्याचा सरकारला घरचा आहेर! फेरविचार करण्याचं राजकुमार बडोलेंचं आवाहन
अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णयावरून माजी सामाजिक न्यायमंत्र्याचा सरकारला घरचा आहेर! फेरविचार करण्याचं राजकुमार बडोलेंचं आवाहन
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
पंतप्रधानांनी शिक्षणमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावं, अरविंद केजरीवालांची मागणी, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिला पाठिंबा
पंतप्रधानांनी शिक्षणमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावं, अरविंद केजरीवालांची मागणी, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
Embed widget