एक्स्प्लोर

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद; शेकडो हेक्टरला नुकसानीचा फटका

Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51.74 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. 

Hingoli Rain Update : मागील काही दिवसांपासून हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पावसाच्या पाण्यामुळे खरडून गेली आहे. दरम्यान, शुक्रवारी देखील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात 28 जुलैच्या सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासांत 41.70 मि.मी. पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 411.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 51.74 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. 

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी...

हिंगोली 18.60 (444.60) मि.मी., कळमनुरी 60.70(459.70) मि.मी., वसमत 94.20 (442.60) मि.मी., औंढा नागनाथ 9.40 (395.20) मि.मी, सेनगांव 10 (301.20) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 411.50 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

वसमत शहरातील तलाव फुटला... 

हिंगीलो जिल्ह्यातील वसमत शहरातील गुरुद्वारा परिसरात असलेला प्राचीन गाव तलाव फुटला आहे. गुरुवारी रात्री परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे हा तलाव फुटला असल्याचे समोर आले आहे. अचानक तलाव फुटल्याने परिसरात पाणीच पाणी पाहायला मिळाले. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गोंधळ उडाला होता. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांना अक्षरशः रात्र जागून काढावी लागली. प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. दरम्यान, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली असून, पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 

मोठ्याप्रमाणात नुकसान... 

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, यंदा जून महिना कोरडा गेल्यावर जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, अनेक भागांत पुन्हा अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो एकर जमीन पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे. नद्या नाल्यांना पूर आल्याने पाणी शेतात आणि घरात घुसल्याने देखील नुकसान झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

नुकसानभरपाई देण्याची मागणी... 

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन, सावकाराकडून, तसेच हातउसणे पैसे घेऊन पेरण्या केल्या आहेत. मात्र, जोरदार पावसामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकरी परत एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. 

इतर महत्वाचे बातम्या: 

Hingoli : गावात अनधिकृतरीत्या महापुरुषांचा पुतळा बसवल्याची माहिती न देणे पोलीस पाटलाला महागात पडले; थेट निलंबनाची कारवाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
Nashik NEET Paper Leak: माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया
माझा मुलगा निर्दोष, तो सहा महिन्यांपासून...; NEET पेपरफुटी प्रकरण, आरोपी शुभमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
Embed widget