एक्स्प्लोर

Jitendra Awhad on Maratha Reservation : मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra Awhad on Maratha Reservation : जी गोष्ट सरकारच्या हातातच नाही, ती गोष्ट करण्याचे आश्वासन राज्य सरकारने का दिले असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

भिवंडी: मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ असून राज्य सरकार दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करतंय, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलीये. जी गोष्ट सरकारच्या हातातच नाही, ती गोष्ट करण्याचे आश्वासन राज्य सरकारने का दिले असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केलाय. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान वाद लावण्याचे काम राज्य सरकारने केले. दंगे केल्याशिवाय राज्य सरकारला मतं मिळणार नाहीत. तीन वर्षात सरकार एकमेकांची मर्जी सांभाळत आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. महायुतीमधील एकाही पक्षाच्या मंत्र्यांने किंवा खासदाराने संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला नाही. राज्यातील परिस्थिती तणावग्रस्त करण्याची जबबादारी देखील राज्य सरकारवरच असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्य सरकारच्या पटलावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिलीये. 

मराठ्यांचं वादळ मुंबईच्या वेशीवर

दरम्यान अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला. मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशी येथे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारसमोर ठेवलेल्या मागण्यांचा अध्यादेश आजच काढण्याची मागणी केलीये. जर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हा अध्यादेश काढला नाही, तर आम्ही मुंबईत धडकणार असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 

  • नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या
  • शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या 
  • कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा 
  • जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
  • आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा 
  • आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
  • SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या 
  • वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या
  • रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही

हेही वाचा :

Manoj Jarange : अध्यादेश निघाला तर पोलिसांचा मान ठेवून पुढं जाणं टाळीनही, पण जर नाही आले तर... पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मनोज जरांगेंनी स्पष्टचं सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA-MNS Alliance:: 'निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसकडून गंभीर प्रश्नचिन्ह
Thane Eknath Shinde VS BJP: 'ठाण्यात कमळ उगवून दाखवेल', CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे Ganesh Naik प्रभारी
BJP Vs Congress: 'निवडणूक आयोग BJP चा पिटू', काँग्रेस नेते Atul Londhe यांचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप
NCP vs NCP: स्थानिक निवडणुकीसाठी Ajit Pawar गटाचा ३-सूत्री फॉर्म्युला; महायुतीला पहिले प्राधान्य
Maha Poll Politics: 'जिथे शक्य नाही, तिथे मैत्रीपूर्ण लढत', भाजपची स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
Embed widget