एक्स्प्लोर

अबू आझमींकडून कल्याणमधील 464 एकर जमिनीचा प्रश्न विधानसभेत; महसूलमंत्र्याचं उत्तर, वाद नेमका काय?

कल्याणमधील ही 464 एकर जमीन ही आदिवासी नाही ती अनेक वेळा खरेदी विक्री झाली असून सध्या ती जमीन संजय चंद्रकांत शहा आणि देवराम सुरोसे यांच्या नावावर आहे

ठाणे : विधिमंडळाच्या पावसाची अधिवेशनाचे (Assembly) आज सूप वाजले, विरोधकांनी विविध शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरले होते. तसेच, अनेक आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्या समस्या, स्थानिक प्रश्न आणि काही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गलथान कारभावरही लक्ष वेधले होते. त्यात, कल्याण (Kalyan) तहसीलमधील कांबा ग्रामपंचायतीत आदिवासी आणि शेतकऱ्यांची 464 एकर जमीन फर्जी शेतकरी बनून हडपल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात यावर तीव्र चर्चा झाली. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आसिम आजमी यांनी या मुद्द्यावर विधानसभेत सवाल उपस्थित केला, मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विशाल कुमार गुप्ता यांनी केला आहे.

कल्याणमधील ही 464 एकर जमीन ही आदिवासी नाही ती अनेक वेळा खरेदी विक्री झाली असून सध्या ती जमीन संजय चंद्रकांत शहा आणि देवराम सुरोसे यांच्या नावावर आहे. तसेच या प्रकरणातील न्यायालयीन वाद संपले आहेत, असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बोलताना दिले. 

जमिनीचा वाद नेमका काय?

कांबा ग्रामपंचायतमधील सर्वे नंबर 35, 52, 64, 77, 125 या क्षेत्रातील एकूण 464 एकर जमीन, अंदाजे 2000 कोटी रुपये किंमतीची असून, ती मूळ आदिवासी आणि शेतकऱ्यांकडून बोगस शेतकरी बनून काही व्यावसायिक आणि पूंजीपतिंनी हडपल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये भ्रष्ट सरकारी अधिकारी व भूमाफियांचे संगनमत असून तीन वेळा ही जमीन सरकार जमा झाली होती. मात्र, न्यायालयात योग्य साक्ष न सादर केल्यामुळे ती जमीन परत खासगी व्यक्तींच्या नावावर गेली. विशेषतः सर्वे नंबर 35 मध्ये वास्तव्यास असलेल्या शेकडो आदिवासी कुटुंबांवर विस्थापनाचा धोका निर्माण झाला आहे.

विधानसभेतील सवाल – अबू आजमी यांची मागणी:

1. गैरशेतकऱ्यांना शेतकरी दाखवून जमीन कशी हस्तांतरित झाली?

2. जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली?

3. पीडित शेतकरी व आदिवासींना न्याय कधी मिळणार?

4. जमीन पुन्हा सरकार जमा करण्यासाठी काय पावले चलली गेली आहेत?

मंत्री बावनकुळे यांचे उत्तर 

ही जमीन आदिवासी नाही ती अनेक वेळा खरेदी विक्री झाली असून सध्या ती जमीन संजय चंद्रकांत शहा आणि देवराम सुरोसे यांच्या नावावर आहे तसेच या प्रकरणातील न्यायालयीन वाद संपले आहेत

‘परहित चेरिटेबल सोसायटी’चा आक्षेप:

या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या परहित चेरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता यांनी मंत्री महोदयांनी चुकीची व अपूर्ण माहिती अधिवेशनात सादर केल्याचा आरोप केला.

उपलब्ध सातबारा उताऱ्यांवर आदिवासींची नावे स्पष्टपणे नमूद आहेत ही जमीन आदिवासी जमीन म्हणून अधिसूचित आहे सध्या प्रकरणाची सुनावणी कल्याण तहसील प्रांत कार्यालय उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगात सुरू आहे

गुप्ता यांची मागणी:

फसवणूक करून जमीन हडपणाऱ्या भूमाफियांवर गुन्हे दाखल करावेत.

बेकायदेशीर शेतकरी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करावी.

ही जमीन पुन्हा सरकार जमा करून मूळ आदिवासी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget