एक्स्प्लोर

Jalgaon: रेशीम शेतीने शेतकऱ्याला दिली आर्थिक साथ; जामनेरचा शेतकरी ठरतोय इतरांसाठी आदर्श

केळी, कापूस पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील देव पिंपरी गावच्या नाना पाटील या शेतकऱ्याने रेशीम शेतीमध्ये लाखो रुपयांची कमाई करून दाखवत परिसरातील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

Agriculture News: जळगाव जिल्हा केळी (Banana) आणि कपाशीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र गेल्या काही वर्षांत या दोन्ही पिकांमध्ये शेतकऱ्यांना (Farmers) सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी आता नवीन वाटा शोधायला सुरुवात केली आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देव पिंपरी गावच्या नाना पाटील यांनी रेशीम शेतीचा (Silk Farming) पर्याय शोधून काढला. रेशीम शेतीच्या माध्यमातून ते दरमहा 80 हजार रुपयांची कमाई करत आहेत. परिसरातील अन्य शेतकऱ्यांपुढे त्यांनी आपला आदर्श ठेवला आहे

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देव पिंपरी गावचे नाना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती आहे, वाडवडिलांपासून जोपासलेल्या शेतीत ते केळी (Banana) आणि कापूस (Cotton) पिकाची पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, मात्र गेल्या काही वर्षांत त्यांना ही दोन्ही पिकं घेताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. कधी मजुरांची अडचण, तर कधी रोगराई, तर कधी पिकाला भाव मिळत नसल्याची अडचण, अशा अनेक अडचणीमुळे नाना पाटील यांना शेतीमध्ये मोठे नुकसान पाहायला मिळत असे.

दरवर्षी सातत्याने येणाऱ्या या अडचणींमुळे नाना पाटील यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या नातेवाईकांनी यश मिळवलेल्या रेशीम शेतीचा (Silk Farming) पर्याय निवडला. आपल्या पाच एकर पैकी त्यांनी दोन एकर क्षेत्रात रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या तुतीची लागवड केली, त्यासाठी त्यांनी संपूर्ण पणे सेंद्रिय पद्धतीचा वापर केला. पाण्याचे आणि शेणखताचे योग्य नियोजन करुन नाना पाटील यांनी उत्तम दर्जाचा तुती पाला निर्माण करण्यात यश मिळवले.

तुतीची लागवड करून झाल्यानंतर आपल्या दोन एकर शेतीत त्यांनी 30 बाय 50 फूट अशा आकाराच्या शेडची रेशीम अळीसाठी उभारणी करून घेतली. यासाठी त्यांना एकूण पाच लाख रुपयांचा खर्च आला, मात्र शासन योजेनेतून तीन टप्प्यांत तो अनुदान म्हणून मिळाल्याने नाना पाटील यांना हा खर्च पूर्णपणे मोफत पडला.
 
रेशीम शेतीविषयी अगोदर कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी शासनाच्या योजनेतून रेशीम शेतीचे मार्गदर्शन मिळवले, शिवाय त्यांच्या नातेवाईकांच्या अनुभवाचा फायदा घेत रेशीम शेतीला सुरुवात केली. तुती पाल्याच्या प्रमाणानुसार त्यांनी कधी दोनशे अंडी पूंजी, तर कधी तीनशे अंडी पूंजीची ब्याच लावून त्यापासून कधी दोन क्विंटल, तर कधी तीन क्विंटल मालाची निर्मिती करण्यात यश मिळवले.

रेशीम अंडी कोषाला कधी पन्नास हजार, तर कधी ऐंशी हजार रुपये प्रति क्विंटल भाव त्यांना मिळत गेल्याने सरासरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति महिना नफा त्यांना मिळतो. रेशीम शेती नाना पाटील यांच्यासाठी चांगले आर्थिक उत्पन्न देणारे साधन बनल्याने रेशीम शेती हे शास्वत उत्पन्न असल्याचं नाना पाटील यांचं मत आहे.

पूर्वी केळी कापूस पिकासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट करूनसुद्धा पुरेसे उत्पन्न मिळत नसे, शिवाय मजूर टंचाईमुळे नेहमीच शेतीच्या कामाचं टेन्शन असायचं. वर्षभर मेहनत करुनही हातात काय राहील याचा भरवसा नव्हता, आता मात्र केवळ बावीस दिवसांत वर्षभर जेवढी कमाई दुसऱ्या पिकात होत नाही तेवढी कमाई  रेशीम शेतीत होत आहे. रेशीम शेतीत मजूर देखील कमी लागत असल्याने एखाद्या सरकारी नोकरीपेक्षाही चांगल्या पद्धतीने पगारासारखे उत्पन्न मिळत असल्याचे नाना पाटील यांच्या पत्नी सुरेखा पाटील यांनी म्हटलं आहे.

नाना पाटील आणि सुरेखा पाटील या दाम्पत्याने रेशीम शेतीत मिळवलेल्या यशाची चर्चा संपूर्ण जामनेरसह जिल्ह्यात होऊ लागल्याने नाना पाटील यांच्या रेशीम शेतीचा पॅटर्न पाहण्याचा मोह राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनाहीआवरता आला नाही. नाना पाटील यांचा रेशीम शेतीचा प्रयोग समजून घेताना, रेशीम शेती एक आदर्श असून पारंपरिक शेतीसह आता नवीन प्रकारचे प्रयोग शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

Beed News : गायरान अतिक्रमण प्रकरण तापणार; आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Maharashtra Live blog updates: रिश्ते ही मायने रखते है .. प्रचाराला बोलविल्यास जाणार सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Maharashtra Live blog updates: रिश्ते ही मायने रखते है .. प्रचाराला बोलविल्यास जाणार सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
Nashik Yeola News: महामार्ग पोलिसांनी मालवाहू ट्रक अडवला, चालकाने पैसे न दिल्याने पोलिसांनी चक्क ट्रक जाळला; पंजाबमधील ट्रक मालकाच्या आरोपांनी खळबळ
महामार्ग पोलिसांनी मालवाहू ट्रक अडवला, चालकाने पैसे न दिल्याने पोलिसांनी चक्क ट्रक जाळला; पंजाबमधील ट्रक मालकाच्या आरोपांनी खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
Embed widget