एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Water Crisis : मंगळवेढ्यातील 24 गावांचा कर्नाटकात जाण्याचा ठराव, आता मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनीही वेळ दिला; महाराष्ट्र सरकार मात्र झोपलेलंच 

Solapur Water Issue : सोलापुरातील कायम दुष्काळी 24 गावातील नागरिक कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांची भेट घेणार आहेत. अलमट्टी धरणातून पाणी द्या आणि गावे कर्नाटकाला जोडा अशी त्यांनी मागणी केली आहे. 

सोलापूर : कायम दुष्काळी असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी (Solapur Mangalvedha Water Issue) अलमट्टीच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय. गुरुवारी  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट भेटीची वेळ दिल्याने या गावातील ग्रामस्थ 24 गाड्या घेऊन बंगळुरूकडे रवाना  होणार आहेत. यामुळे  लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारसाठी हा धक्का मानला जातोय. 

गुरुवारी  बंगळुरू येथे मुख्यमंत्री कार्यालयात या 24 गावातील प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडीचा फटका सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीवर होणार असून राज्यातही विरोधकांना प्रचारासाठी आयते कोलीत मिळणार आहे.  

पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर गेले अनेक वर्षे राजकारण सुरु असताना महाराष्ट्रातील या 24 गावांनी थेट कर्नाटकाला जोडण्याची मागणी केल्यावर राज्य सरकारला जाग येणे अपेक्षित होते. मात्र या 24 गावांनी ग्राम ठराव करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या गावातील प्रतिनिधींनी दोन बैठक घेतल्यावरही शासनाने यांच्या मागणीची दखल न घेतल्याने या गावांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी 11 ते ३ यादरम्यान भेटीची वेळ दिल्याने या 24 गावातून सर्व प्रतिनिधी आणि ग्रामस्थ बुधवारी पहाटे बंगळुरूकडे निघणार आहेत. 

उपसा सिंचन योजना बनवली पण निधी नाही

मंगळवेढा तालुका हा कायमचा दुष्काळी तालुका असून येथे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीलाही कधी पाणी मिळत नव्हते. यासाठी गेले 50 वर्षे केवळ या गावांच्या पाण्यावर राजकारण होऊन अनेक आमदार खासदार निवडून आले पण या गावांचा घास कोरडाच राहिला. यानंतर या गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना बनविण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांची सही देखील झाली असली तरी अद्याप या योजनेस निधीची तरतूद झाली नसल्याने लोकसभा आचारसंहितेपूर्वी निधीची घोषणा करण्याची या गावांची मागणी होती. 

निवडणूक प्रचारकाळ असो अथवा विधानसभा अधिवेशन असो, राज्यातील सर्वच नेत्यांनी या गावांना पाणी देण्याच्या घोषणा केल्या. मात्र या योजनेला निधी मिळू शकलेला नाही. उजनी धरणात असणाऱ्या अतिरिक्त 2 टीएमसी पाणी या गावांना उपसा करून देणारी ही  योजना सध्या लालफितीत अडकल्याने याला निधीची घोषणा होऊ शकलेली नाही. 

वैतागलेल्या गावकऱ्यांचं कर्नाटकला साकडं

याउलट कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाचे पाणी मंगळवेढा तालुक्याच्या बॉर्डरवर आल्याने आम्हाला अलमट्टीच्या पाण्याची शाश्वती वाटते अशी भूमिका या गावांनी घेतली आहे. कर्नाटक सीमेपासून अगदी कमी अंतराचे कॅनॉल काढून या 24 गावांचा पाण्याचा प्रश्न हातोहात सुटू शकणार असल्याने या गावांनी आता जगण्यासाठी कर्नाटक बरे अशी ठाम भूमिका घेतली आहे. 

गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय आश्वासन देतात त्यावर या 24 गावांचा निर्णय अवलंबून असणार आहे. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी गेले अनेकवर्षे सीमावादावर बोलणारे मोठमोठे नेते आणि सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील या कायम दुष्काळी गावांचा प्रश्न सोडविण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आता या गावांचा संयम सुटला आणि महाराष्ट्र पाणी देणारच नसेल तर जगण्यासाठी कर्नाटकात जाऊ ही भूमिका घेऊन हे ग्रामस्थ कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. 

अजूनही आचारसंहिता लागली नसली तरी राज्य सरकारने या योजनेस किमान निधी जाहीर केला तर या गावांचे कर्नाटकात सामील होणे थांबू शकणार आहे. अन्यथा ही राज्यातील शिंदे-भाजप सरकारवर मोठी नामुष्कीची वेळ ठरेल. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Navneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP MajhaAjit Pawar Full PC on Sunetra Pawar : बहिणीने पत्नीला हरवलं, अजितदादांची पहिली प्रतिक्रिया!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget