एक्स्प्लोर

Manoj Jarange : मर्यादी संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगेंचा आता थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

Manoj Jarange : सहा महिने तुम्ही आमचे फुकटचे घालवले आहात, आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू ते तुम्हाला दाखवून देऊ, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

सोलापूर : मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करतांना पाहायला मिळत आहे. अशात आता जरांगे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील निशाणा साधत टीका केली आहे. 'मर्यादी संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात' असे म्हणत मनोज जरांगेंनी आता थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. जरांगे आज सोलापूर (Solapur) जिल्ह्याचा दौऱ्यावर असून, 'एबीपी माझा'शी बोलतांना त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला, पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करत असतो. नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ. समाजाचे म्हणणे आहे की तुम्ही उपोषण करू नका. समाजाच्या विरोधात जाऊन राजकीय अस्तित्व निर्माण करता येणार नाही हे सरकारला लक्षात कसे येत नाही. सहा महिने तुम्ही आमचे फुकटचे घालवले आहात, आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू ते तुम्हाला दाखवून देऊ, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत. 

माझा राजकीय मार्ग नाही...

पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "ज्वलंत मराठा समाजाला अंगावर घेऊन, सरकार निवडणुका घेणार नाही. निवडणुका होणारच नाही, तर मराठा मतदान कोणाच्या बाजूने देणार हा प्रश्नच नाही. सरकारने जाणीवपूर्वक खोटे आरोप सुरु केले असून, कार्यकर्त्यांना गुंतवायला सुरु केलं आहे. सगेसोयऱ्यांच्या संदर्भात अधिसूचना काढली आहे, मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. दहा टक्के आरक्षण देऊन समाज समाधानी आहे, असे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. माझा राजकीय मार्ग नाही, पण मराठ्यांचा इतका ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका घेणार नाही. शेकडोंची उमेदवारी दाखल करण्यासंदर्भात निर्णय समाजाने घेतला आहे, तो निर्णय समाजाचा आहे. तर, मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

लोकसभेला इतके उमेदवार की, यांचे चिन्हचं दिसणार नाहीत....

यांच्या आजूबाजूला फिरणारे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर एसआयटी लावायला हवी, पण माझ्यावर लावली आहे. मी पळून जाणारा नाही. फडणवीस साहेब मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत पळणार नाही. बीडमध्ये 3404 फॉर्म भरण्यासाठी तयार झाले, लोकसभेला इतके उमेदवार झाले की यांचे चिन्हचं दिसणार नाहीत. आपली मागणी ओबीसीतून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी अशी आहे. लोकसंख्या जास्त असताना यांनी केवळ दहा टक्के आरक्षण दिलं, त्यात ही सवलत नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो, आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

 फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या,अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील; जरांगेंचा इशारा

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
शालार्थ आयडी घोटाळ्यात सर्वात मोठी अटक, भाजप पदाधिकाऱ्याला सोलापूरच्या फार्महाऊसमधून बेड्या
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
चंद्रभागेचं वाळवंट पाण्याखाली जाणार, उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
चंद्रभागेचं वाळवंट पाण्याखाली जाणार, उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget