एक्स्प्लोर

Vijaydurg Fort : कोकणातील 820 वर्षाचा विजयदुर्ग किल्ला ढासळतोय, पाण्याखाली जाण्याची शिवप्रेमींना भीती 

Sindhudurg, Vijaydurg Fort : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत.

Sindhudurg, Vijaydurg Fort : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत. 14 ऑगस्ट रोजी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी 14 ऑगस्टला समुद्राच्या लाटांमुळे ढासळली. ही ढासळलेली तटबंदी मच्छीमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळे तटबंदी ढासळली हे समोर आलं. तटबंदीचा काहिसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उदभवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत.

दोन वर्षापुर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजा जवळील तटबंदी ढासळलेली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व लोकप्रतिनिधींची पाहणी करुन सदर किल्ल्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेले लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने आजपर्यंत त्या बुरुजाची डागडुजी केलेली नाही. माजी खासदार संभाजीराजे यांनीही विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षापुर्वी तटबंदी ढासळली त्यावेळी प्रत्यक्ष येवून पाहणी केली होती.

विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 पासून 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. विजयदुर्ग किल्ला 820 वर्ष प्राचीन आहे. हा किल्ला इ. स. 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला. कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने राज्य केले. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर पाच एकरच्या क्षेत्रफळा मध्ये वसलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले. सध्या 17 एकरवर किल्ल्या आहे, मात्र त्याची पडझड होत आहे. 

विजयदुर्ग  किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. जमिनीवरून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. 30 मीटर उंच खडकावर या किल्ल्याची तटबंदीची भींत 300 फूट उंच आहे. किल्ल्याची भींत ही 10 मीटर उंच आहे. समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे. अश्या तीन तटबंदी या किल्ल्याला आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी हकालपट्टी करताच बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईत, नितेश राणेही सोबतीला, पुढचा प्लॅनही सांगितला!
ठाकरेंनी हकालपट्टी करताच बाळ माने चार्टर्ड विमानाने मुंबईत, नितेश राणेही सोबतीला, पुढचा प्लॅनही सांगितला!
Bal Mane Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
ठाकरेंच्या उमेदवाराची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; आज 2 स्टेटस ठेवले, म्हणाले, रिव्हेंज इज जस्ट...
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
अभिजीत दीपके दिल्लीत, जंतरमंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 
Suryakumar Yadav: वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
वर्ल्डकप जिंकूनही कॅप्टनशीप गेली, टीम इंडियातून सुद्धा उचलबांगडी; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, मोजक्याच शब्दात बरंच काही बोलला!
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
दिल्लीत आंदोलन, गल्लीत पोलिसांची फौज; अभिजीत दीपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर तगडा बंदोबस्त
India vs Afghanistan: केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धाा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
केएल राहुलचे खणखणीत शतक, गिलची कॅप्टनी खेळी अन् रिषभ पंतला सुद्धा सुर गवसला, सुदर्शनची सुद्धा फिफ्टी; टीम इंडियाची अफगाणविरुद्ध दमदार सुरुवात
Cockroach Janta Party Jantar Mantar: कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
कॉकरोच जनता पार्टीचा जंतर-मंतरवर 5 तास एल्गार; धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम, सोनग वांगचुक सहभागी, उद्धव ठाकरे अन् रोहित पवारही आंदोलनावर बोलले
Embed widget