एक्स्प्लोर

Hapus : हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता, एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार  

Hapus : बदलत्या हवामानामुळं पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील हापूस (Hapus) आंब्यावर देखील या बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे.

Hapus : सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा (climate change) शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. कोकणातील हापूस (Hapus) आंब्यावर देखील या बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे. कोकणातल्या (Konkan) हापूस आंब्याचे बिघडलेलं चक्र कडाक्याच्या थंडीमुळे सुरळीत होईल अशी आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरली. आजतागायत केवळ 10 टक्के आंब्याच्या झाडांवर मोहोर आला आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याचं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

15 एप्रिल ते 15 मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भारणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहोर न आल्यास हापूसवरती असलेलं अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं अनेक बागायतदारांनी कामगारांना एक प्रकारचा अल्टीमेटमच देऊन ठेवला आहे. म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूसची अपेक्षित मोहोर प्रक्रिया न झाल्यास कामगारांना त्यांचा त्या दिवसापर्यंतचा हिशोब देऊन घरी पाठवलं जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तब्बल एक लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.

कमी फळधारणा

सध्या कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानामुळे खूप कमी फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. 

फवारणीसह मशागतीचा मोठा खर्च 

फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे.

10 फेब्रुवारीपर्यंत आंब्याला मोहोर आला नाही तर...

मागील 20 वर्षापासून अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती. हवामान बदलाचा आंब्यावर मोठा परिणाम होत आहे. यंदा आंब्याला कमी प्रमाणात मोहोर आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 10 फेब्रुवारीपर्यंत जर आंब्याला मोहोर आला नाही तर कोकणातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत मोहोर आला तरच एप्रिलमध्ये सर्वसामान्य लोकांना आंबा खायला मिळू शकतो अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : बदलत्या हवामानाचा आंब्यासह काजू पिकाला फटका, फक्त 25 टक्केच फळधारणा; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे
तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget