एक्स्प्लोर

Agriculture News : बदलत्या हवामानाचा आंब्यासह काजू पिकाला फटका, फक्त 25 टक्केच फळधारणा; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे.

Agriculture News : सध्या राज्यात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात आंबा (Mango) आणि काजू (Cashew) पिकांना फक्त 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

मशागतीसाठी झालेला खर्चही निघणं अवघड

बदलत्या हवामानामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदल्या हवामानामुळ केवळ 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही  बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे. 

राज्याच्या इतरही भागात वातावरण बदलाचा पिकांना फटका

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या संकटातून बाहेर पडत आता शेतकरी रब्बीच्या पिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाच वातावरणातील बदलाचा फटका रब्बीच्या पिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्याप्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात केळी पिकावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. याचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : थंडी वाढली मागणी घटली, नंदुरबारमध्ये केळीच्या दरात घसरण; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्तराखंड, हिमाचलनंतर आता दार्जिलिंगमध्ये हाहाकार; 7 ठिकाणी भूस्खलन, 13 जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त, रस्त्यांवर ढिगारा, सिक्कीमशी संपर्क तुटला
उत्तराखंड, हिमाचलनंतर आता दार्जिलिंगमध्ये हाहाकार; 7 ठिकाणी भूस्खलन, 13 जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त, रस्त्यांवर ढिगारा, सिक्कीमशी संपर्क तुटला
दुष्काळात तेरावा! पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
दुष्काळात तेरावा! पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
सरकारकडून 10-10 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो; सीएम फडणवीसांचा इशारा
सरकारकडून 10-10 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो; सीएम फडणवीसांचा इशारा
शिर्डी साईंच्या जिल्ह्यातून अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत स्पष्टच सांगितलं
शिर्डी साईंच्या जिल्ह्यातून अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तराखंड, हिमाचलनंतर आता दार्जिलिंगमध्ये हाहाकार; 7 ठिकाणी भूस्खलन, 13 जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त, रस्त्यांवर ढिगारा, सिक्कीमशी संपर्क तुटला
उत्तराखंड, हिमाचलनंतर आता दार्जिलिंगमध्ये हाहाकार; 7 ठिकाणी भूस्खलन, 13 जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त, रस्त्यांवर ढिगारा, सिक्कीमशी संपर्क तुटला
दुष्काळात तेरावा! पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
दुष्काळात तेरावा! पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
सरकारकडून 10-10 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो; सीएम फडणवीसांचा इशारा
सरकारकडून 10-10 हजार कोटी घेता आणि नफ्यातून शेतकऱ्यांना पाच रूपये देण्याची दानत नाही; काटामारी करणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो; सीएम फडणवीसांचा इशारा
शिर्डी साईंच्या जिल्ह्यातून अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत स्पष्टच सांगितलं
शिर्डी साईंच्या जिल्ह्यातून अमित शाहांचा शब्द; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत स्पष्टच सांगितलं
हिंदवीसाठी टाळ्या व्हायलाच हव्या; पूरग्रस्त भागात जाऊन मायेची उब, चिमुकल्यांना शाळेच्या साहित्याची मदत
हिंदवीसाठी टाळ्या व्हायलाच हव्या; पूरग्रस्त भागात जाऊन मायेची उब, चिमुकल्यांना शाळेच्या साहित्याची मदत
Jalgaon Crime News : जळगावात थरारक हल्ला, आधी घरावर दगडफेक, नंतर चक्क गोळीबार; परिसरात खळबळ
जळगावात थरारक हल्ला, आधी घरावर दगडफेक, नंतर चक्क गोळीबार; परिसरात खळबळ
Sadabhau Khot: एका जागेचा दर 30 लाख! सांगली जिल्हा बँकेच्या नोकरभरतीवरून आमदार सदाभाऊंचा आपल्याच सरकारमधील सहकार मंत्र्यावर गंभीर आरोप
एका जागेचा दर 30 लाख! सांगली जिल्हा बँकेच्या नोकरभरतीवरून आमदार सदाभाऊंचा आपल्याच सरकारमधील सहकार मंत्र्यावर गंभीर आरोप
Ajit Pawar : पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, अमित शाहांकडून वचन; अजित पवार काय-काय म्हणाले?
पंचनाम्याचा प्रस्ताव द्या, केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो, अमित शाहांकडून वचन; अजित पवार काय-काय म्हणाले?
Embed widget