एक्स्प्लोर

Agriculture News : बदलत्या हवामानाचा आंब्यासह काजू पिकाला फटका, फक्त 25 टक्केच फळधारणा; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे.

Agriculture News : सध्या राज्यात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात आंबा (Mango) आणि काजू (Cashew) पिकांना फक्त 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

मशागतीसाठी झालेला खर्चही निघणं अवघड

बदलत्या हवामानामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदल्या हवामानामुळ केवळ 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही  बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे. 

राज्याच्या इतरही भागात वातावरण बदलाचा पिकांना फटका

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या संकटातून बाहेर पडत आता शेतकरी रब्बीच्या पिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाच वातावरणातील बदलाचा फटका रब्बीच्या पिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्याप्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात केळी पिकावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. याचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : थंडी वाढली मागणी घटली, नंदुरबारमध्ये केळीच्या दरात घसरण; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
Unseasonal Rain: भर उन्हाळ्यात पावसाचा हाहाकार, तर 2050 मध्ये देशात अभूतपूर्व अन्न अन् पाणी टंचाई निश्चित! पर्यावरण तज्ञ पोपटराव पवारांनी व्यक्त केली भीती
भर उन्हाळ्यात पावसाचा हाहाकार, तर 2050 मध्ये देशात अभूतपूर्व अन्न अन् पाणी टंचाई निश्चित! पर्यावरण तज्ञ पोपटराव पवार नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
...अन्यथा शेतकऱ्याला भगतसिंग व्हायला वेळ लागणार नाही, शेती प्रश्नावरुन बच्चू कडूंचा प्रहार, येवल्यात एल्गार
...अन्यथा शेतकऱ्याला भगतसिंग व्हायला वेळ लागणार नाही, शेती प्रश्नावरुन बच्चू कडूंचा प्रहार, येवल्यात एल्गार

व्हिडीओ

Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Embed widget