एक्स्प्लोर

Agriculture News : बदलत्या हवामानाचा आंब्यासह काजू पिकाला फटका, फक्त 25 टक्केच फळधारणा; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Agriculture News : बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे.

Agriculture News : सध्या राज्यात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत आहेत. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. कोकणात बदलत्या हवामानाचा (Climate Change) फटका आंबा आणि काजू पिकांना बसला आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात आंबा (Mango) आणि काजू (Cashew) पिकांना फक्त 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

मशागतीसाठी झालेला खर्चही निघणं अवघड

बदलत्या हवामानामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आहेत. कारण बदलत्या हावामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, यावर्षी बदल्या हवामानामुळ केवळ 25 टक्केच फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही  बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बाजूला उत्पादनात होणार घट आणि खर्च वाढत आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं बँकांचं कर्जही वाढत आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे बँकांचं कर्ज फेडणं शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे. 

राज्याच्या इतरही भागात वातावरण बदलाचा पिकांना फटका

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या संकटातून बाहेर पडत आता शेतकरी रब्बीच्या पिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाच वातावरणातील बदलाचा फटका रब्बीच्या पिकांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात यावर्षी मोठ्याप्रमाणात लागवड झालेल्या हरभरा पिकावर सध्या बदलत्या वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे घाटे अळीच्या नुकसानीची पातळी ओळखून शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने हरभऱ्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात केळी पिकावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. याचा फटका नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : थंडी वाढली मागणी घटली, नंदुरबारमध्ये केळीच्या दरात घसरण; शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
शेती आपली आई, तिला रासायनिक खतांपासून वाचवावं लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना आवाहन
Onion Farmers: कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांद्याला अवघा 50 पैसे प्रतिकिलो भाव! 73 पोती कांदा विकून हाती आले 400 रुपये; वाढत तापमान अन् अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकरी आले रडकुंडीला
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
सलग दुसऱ्या दिवशी वातावरणात मोठा बदल, तळकोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget