एक्स्प्लोर

Vishwas Patil VIDEO : एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट; विश्वास पाटलांचे वक्तव्य

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : आपण तमाशाच्या किंवा उसाच्या फडातील पाटील नसून शब्दाच्या फडातील पाटील असल्याचं विश्वास पाटील म्हणाले. 

सातारा :  साहित्य संमेलनासाठी एका पाटलाला अध्यक्ष करा अशी मागणी कुलकर्णी-जोशींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते असं वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी केलं. तसेच विश्वास पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक केलं, साताऱ्याची गौरवगाथा मांडली. साताऱ्यात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो तर तो आचार विचाराची आणि देशाला दिशा देण्याचा कार्यक्रम असतो. काँग्रेसची स्थापना होण्याआधीही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाल्याचं विश्वास पाटलांनी नमूद केलं. एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट असल्याचं विश्वास पाटील म्हणाले. 

Vishwas Patil Speech : काय म्हणाले विश्वास पाटील? 

उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, "पाटील म्हटलं की तीन फड आठवतात ते म्हणजे कुस्तीचा फड, तमाशाचा फड आणि उसाचा फड. पण हा पाटील शब्दाच्या फडातला पाटील आहे. 99 व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा अशी मागणी जोशी आणि कुलकर्णींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. ही आपली जुनी वहिवाट आहे."

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : सावकरांचा किस्सा

विश्वास पाटील यांनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले की, "87 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असे सावरकर म्हणाले होते, ते वाक्य फार गाजले होते. पण त्यांनी पुढं जाऊन सांगितले की मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे. त्यावेळी माय मराठीचा पुरस्कार त्यांनी केला. ज्या ज्या वेळी मराठी भाषेवर संकट येतं त्यावेळी आम्ही साहित्यिक लढा देतो."

नेहरू पंतप्रधान असताना मजनू सुलतानपुरी यांनी त्यांच्यावर टीका केल्याने त्यांना दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला होता. त्यावेळी मोरारजी देसाई यांनी मध्यस्थी केली आणि म्हणाले माफी मागा. त्यावेळी मजनू सुलतानापुरी यांनी मात्र त्यास नकार दिला, झुकायला नकार दिला. हा किस्सा विश्वास पाटील यांनी सांगितला. 

सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आहे. तुमची आचार संहिता असेल तर आमची विचार संहिता आहे. तुमच्या आचारसंहितेचा काळ हा दोन-तीन आठवडे असतो. पण साहित्यकाची विचार संहिता ही अनेक पिढ्यांपर्यंत चालत असं विश्वास पाटील म्हणाले. 

शेतकरी आत्महत्या करतात हे फक्त शासनाचं अपयश नाही तर समाजाचं देखील अपयश आहे असं मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Satara NEET exam death News: नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
नीट परीक्षेचा निकाल आला, नैराश्यात गेली अन् उंदरांना मारण्याच्या विषारी वड्या खाल्ल्या; अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली, शेवटी...
सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात महाकाय दरड कोसळली, वाहतूक बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget