एक्स्प्लोर

Jayant Patil On Abdul Sattar : कृषी मंत्र्यांची भाषा चुकीची; त्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवलाय : जयंत पाटील

Jayant Patil On Abdul Sattar : कृषीमंत्र्यांची भाषा चुकीची आहे, त्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला आहे. शेतकरी आत्महत्याबाबतीत कृषी मंत्री आणि सरकार असंवेदनशील आहे, अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी केली.

Jayant Patil On Abdul Sattar : कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतची कृषीमंत्र्यांची भाषा ही दिलासादायक नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषीमंत्री आणि महाराष्ट्र सरकारही असंवेदनशील आहे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmers Suicide) बाबतीत केलेल्या वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी सत्तार यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते सांगलीच्या (Sangli) कासेगाव इथे बोलत होते. 

शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही, असं बेजबाबदार वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार केलं होतं. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शेतकऱ्यांकडे सरकार कसं बघतंय हे कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन पुन्हा दिसलं : जयंत पाटील

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नवीन नाहीत. त्या नेहमीच्याच आहेत, अशी जर भावना कृषीमंत्र्यांच्या मनात असतील, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार कसं बघतंय, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांची काळजी न घेणारे सरकार आहे. सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शेतकरी आत्महत्या थांबवल्या पाहिजे, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलं.

अब्दुल सत्तार काय म्हणाले होते?

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र असे असताना शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर यातील तीन शेतकरी खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. दरम्यान याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सत्तार यांनी दिलेलं उत्तर संताप आणणारं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.  

सत्तार यांची यापूर्वी अनेक वादग्रस्त वक्तव्ये

दरम्यान अब्दुल सत्तार यापूर्वी देखील आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. त्यांना माफी देखील मागावी लागली होती. त्यातच आता शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरुन सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, आज सभागृहात याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातमी

शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं बेजबाबदार वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget