एक्स्प्लोर

Barsu Refinery: कोणतीही जबरदस्ती नाही, शेतकऱ्यांचं मत लक्षात घेऊन पुढे जाणार; बारसू प्रकरणी उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट

Uday Samant On Ratnagiri Barsu Refinery: बारसू रिफायनरीच्या संदर्भात आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : बारसू प्रकल्पासंबंधात कोणत्याही परिस्थितीत लोकांवर जबरदस्ती केली जाणार नाही, शेतकऱ्यांची मतं लक्षात घेऊनच पुढे जाणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा झाली असून त्यांच्या पुढाकाराने संवादाला सुरुवात झाली असंही उदय सामंत म्हणाले. मंत्री उदय सामंत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन बारसू प्रकल्पाविषयी चर्चा केली. 

रत्नागिरीतील बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रविवारी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर आपण शरद पवारांची भेट घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

शरद पवार यांच्या भेटीनंतर उदय सामंत म्हणाले की, या प्रकल्पाबद्दल लोकांच्या मनात असलेला संशय दूर झाल्याशिवाय हा प्रकल्प होणार नाही, या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या ज्या काही समस्या असतील किंवा त्यांच्या मनात ज्या काही शंका असतील त्या दूर केल्या जातील. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांची चर्चा केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही असं मी शरद पवारांनी सांगितलं. 

ज्या शंका आंदोलकांनी शरद पवारांच्या समोर मांडल्या, त्यावर आज चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, स्थानिकांशी बोलायला सरकार तयार आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही. बारसूत आता फक्त माती परीक्षण होत आहे. त्यानंतर कंपनी ठरवणार की त्या ठिकाणी प्रकल्प करायचा की नाही. 

शासन चर्चेसाठी तयार असल्याचं सांगत उदय सामंत म्हणाले की, प्रकल्प विरोधकांनी रविवारी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर या प्रकल्पाच्या संदर्भात मी पवार यांना सविस्तर माहिती दिली आहे. संवादाला सुरूवात झाली आहे, शरद पवारांनी या चर्चेमध्ये पुढाकार घेतला आहे.

दरम्यान,

प्रकल्प उभारणीसाठी बारसूतील जमीन योग्य आहे की नाही, याचे परीक्षण करण्यासाठी बोअर मारण्यात येणार आहेत. 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारण्याचं काम पूर्ण झालं आहे. 72 पैकी 46 शेतकऱ्यांनी उर्वरित बोअरवेलसाठी सहमती दर्शवली आहे. 

याआधी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery) राज्य सरकारकडून  साडे तेरा हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार होती. पण आताच्या माहितीनुसार, केवळ साडेपाच हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार आहे. प्रकल्पासाठी कमीत कमी जमीन वापरण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget