एक्स्प्लोर

Eknath Shinde Ratnagiri Visit : मुख्यमंत्र्यांचा एकदिवसीय रत्नागिरी दौरा; दिवसभर भरगच्च कार्यक्रम, संध्याकाळी सभा

Eknath Shinde Ratnagiri Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी; दिवसभर भरगच्च कार्यक्रमठाकरे गट कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही

Eknath Shinde Ratnagiri Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) एक दिवसाच्या रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान,राज्यात झालेल्या सत्तातरानंतर आणि शिवसेनेतील मोठ्या राजकीय बंडानंतर, फुटीनंतर होत असलेला दौरा महत्त्वाचा आहे. सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री मुंबईहून शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरीला रवाना होती आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील. 

मुख्यमंत्र्यांचा दिवसभर भरगच्च कार्यक्रम, संध्याकाळी सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून दिवसभर त्यांचा भरगच्च असा कार्यक्रम देखील आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. रत्नागिरीतील एकदिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री विविध पदाधिकारी, संघटनेसोबत चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर संध्याकाळी प्रमोद महाजन संकुलमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर रात्री ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

एकनाथ शिंदे कोकणातील रिफानरीबाबत भाष्य करणार?

मुख्य बाब म्हणजे यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे काही समर्थक आणि सध्या प्रस्तावित असलेल्या बारसू-सोलगाव इथले रिफायनरी विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या लोकांना भेटणार का? तसेच कोकणातील रिफायनरीबाबत मुख्यमंत्री काही भाष्य करणार का? याकडे देखील सर्वांचे कान आणि डोळे लागून असणार आहेत. 

ठाकरे गट कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही : आमदार राजन साळवी

दरम्यान रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते हजर राहणार नाहीत. कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांची नावं आहे. त्यामुळे फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकाच मंत्रावर येणार का याची उत्सुकता लागली होती. मात्र प्रोटोकॉल म्हणून आमचं नाव टाकलं असेल किंवा आम्हाला निमंत्रित केलं असेल, पण त्यांचा तो पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही उपस्थित राहणार नाही असं आमदार राजन साळवी यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी कामं मंजूर झाली, त्यांची आता उद्घाटनं होत आहेत. या कार्यक्रमांना जाणं हे आम्हाला बंधनकारक नाही, असंही राजन साळवी म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं
Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध पुन्हा येतोय, फक्त वेगळ्या भूमिकेत; नव्या मालिकेत साकारणार ताकदीचं पात्र
'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध पुन्हा येतोय, फक्त वेगळ्या भूमिकेत; नव्या मालिकेत साकारणार ताकदीचं पात्र
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Embed widget