एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

रत्नागिरीचो हापूस मुंबईक इलो! यंदाच्या हंगामातली पहिली हापूस पेटी मुंबईला रवाना, एका पेटीला मिळाला एवढा भाव

दापोली तालूक्यातून हर्णेमधून मुंबई मार्केटमध्ये पाठवण्यासाठी या हंगामातील आंब्याची जानेवारी महिन्यातच पहिली पेटी दाखल झाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri)  जिल्ह्यातील दापोलीतील पहिली हापूस आंब्याची (Alphanso Mango)  पेटी मुंबई मार्केटमध्ये रवाना झाली. गेली कित्येक वर्षे हा मान हर्णेच्या मयेकर कुटुंबाकडेच येत आहे. आंबा हे फळ सगळ्याचं आवडत फळ. आंबा पाहिला की सर्वानाच मोह अनावर होतो. आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याला एप्रिल महिना उजाडतो. परंतु दापोली तालूक्यातून हर्णेमधून मुंबई मार्केटमध्ये पाठवण्यासाठी या हंगामातील आंब्याची जानेवारी महिन्यातच पहिली पेटी दाखल झाली आहे.

 फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते.लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. अशातच यंदाच्या हंगामातील हर्णेमधील आंबा बागायतदार सागर मयेकर यांच्याकडून दोन डझनची एक पेटी असा तीन पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. पहिल्या मानाच्या दोन डझन आंब्याच्या पेटीची किंमत 7700  रुपये इतकी झाली. म्हणजेच एका आंब्याची किंमत जवळपास 321 रुपये एवढी झाली आहे. अश्या तिन्ही पेट्यांची एकूण 23112 रुपये अशी किंमत मुंबई मार्केटमध्ये मिळाली. पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. दापोलीतील आंबा विक्री व्यवसायाला साधारण दोन महिने अगोदरच मुहूर्त लागला आहे. 

कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी

हंगामातील पहिला आंबा काढल्यानंतर सागर मयेकर यांनी आंब्याच्या तीनही पेट्या देवघरात ठेऊन विधीवत पूजा केली आणि नंतरच त्या पेट्या मार्केटमध्ये पाठवल्या. कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूसची निर्यात होत असते. महिन्याभरापूर्वी पुण्यात देवगड आब्यांची पहिली पेटी विकली गेली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी हापूस विकला गेला. दापोली तालुक्यातील हर्णेमधील हापूस आंबा मुंबई मार्केट मध्ये विकला गेला. त्यामुळे आंबा पिकाला पुढे हंगामात चांगलं पीक येऊन सुगीचे दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु

यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे.  एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे.  सिंधुदुर्ग, रत्नागिरीरायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून  मार्च किंवा  महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरु होईल. 
 

हे ही वाचा :

Mango : सदबहार आंबा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू, वर्षातून तीन वेळा उत्पादन; जाणून घ्या सविस्तर माहिती 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | ABP Majha
Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण कोणाचा? Supreme Court मध्ये 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी, Thackeray गटाचं भवितव्य ठरणार?
Pune Land Deal: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', Deputy CM Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण
Jarange Murder Plot: 'Dada Garud शी संबंध नाही, दलितांचा बळी देऊ नका', Kanchan Salve आक्रमक
Bihar Polls 2025 : Chiraiya चे BJP उमेदवार Lalbabu Prasad Gupta पैसे वाटताना कॅमेऱ्यात कैद? FIR दाखल.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Exit Poll : तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
तेजस्वी यादवांसाठी अजूनही आशेचा किरण, 'या' एक्झिट पोलने दिले महागठबंधनला बिहारमध्ये बंपर बहुमत
Bihar Exit Poll : बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार, महागठबंधन पिछाडीवर; रुद्र रिसर्च एक्झिट पोलचा अंदाज
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Embed widget