एक्स्प्लोर

Ram Mandir : "मंदिर झाल्यानंतरच परतणार", पीएम मोदींनी 32 वर्षांपूर्वी केला होता रामासाठी मोठा संकल्प

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे(Ram Mandir) उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे.

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे(Ram Mandir) उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासाठी निमंत्रण पत्रिकाही वाटल्या आहेत. पीएम मोदी (PM MODI) 22 तारखेला राम मंदिराचे उद्घाटन करतील. तेव्हा सर्वांना 32 वर्षांपूर्वीचा एक फोटो नक्कीच आठवेल. कारण पीएम मोदींनी (PM MODI) 32 वर्षांपूर्वी राम मंदिराबाबत (Ram Mandir) एक मोठा संकल्प केला होता. 

काय होता संकल्प ?

पीएम मोदी 32 वर्षांपूर्वी अयोध्येत दाखल झाले होते. 14 जानेवारी 1992 हा दिवस मंदिरासाठी महत्वपूर्ण दिवस होता. तेव्हा पीएम मोदी काश्मीर ते कन्याकुमारी काढण्यात आलेल्या एकता यात्रेत सहभागी झाले होते. या दरम्यान ते अयोध्येतील राम जन्मभूमीत पोहचले होते. या वेळी त्यांनी एक संकल्प केला होता. 

तंबूत असलेल्या रामाला पाहून केला होता संकल्प

नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले तेव्हा त्यांनी राम जन्मभूमीला भेट दिली. तेव्हा राम त्यांना तंबूत दिसला. त्यावेळी पीएम मोदींनी श्रीरामाचे दर्शन घेतले. बराच काळ ते रामाच्या फोटोकडे पाहात राहिले. दर्शन घेऊन मोदी परतत होते. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, आता तुम्ही पुन्हा अयोध्येत कधी येणार? तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "मी मंदिर झाल्यानंतरच अयोध्येत परतेन." 

पीएम मोदींनी मुरली मनोहर जोशींसोबत काढली होती यात्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1992 मध्ये ही यात्रा काढली होती. तेव्हा मुरली मनोहर जोशी त्यांच्यासमवेत होते. तेव्हा मोदी भाजपचे महासचिव आणि आरएसएसचे माजी प्रचारक या नात्याने केली होती. नरेंद्र मोदी राम  मंदिराचा विचार किती गांभीर्याने करत होते याचा अंदाज 1998 मध्ये मॉरीशिसमध्ये आला होता. आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत नरेंद्र मोदींनी एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले होते. शिवाय त्यांनी राम मंदिर बांधायचेच, असा विश्वास व्यक्त केला होता. 

कोण जाणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला?

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.आता कोण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवारांनी मी राम मंदिरात गर्दीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार काय भुमिका घेणार? ठाकरे बंधूपैकी कोण जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण

महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत.  त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

CM Eknath Shinde : खासदार मुलगा श्रीकांत शिंदेंच्या घराणेशाहीवर सीएम शिंदे म्हणतात, पक्षाला तेव्हा तरुण, उच्चशिक्षित चेहरा हवा होता

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Embed widget