एक्स्प्लोर

अतिवृष्टीची मदत 2,500 रुपये जमा; शेतकऱ्याने मोबाईलमधील मेसेज दाखवा; बळीराजाचा संताप, हेक्टरी 50,000 द्या

शेतकऱ्याचे जवळपास पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्यानंतर तब्बल अडीच हजार नुकसान भरपाई आल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.

पुणे : राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने (Rain) सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची (Farmers) पिके पाण्यात गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. तत्पूर्वी सरकारने 2215 कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. मात्र, शेतकऱ्यांना ही मदत कुठपर्यंत पुरणार असा प्रश्न आहे. त्यातच, मे महिन्यात मिळालेल्या मदतीनंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मे महिन्यात अतिवृष्टीने (Flood) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या शेतकऱ्याचे पावणे दोन लाखांचे नुकसान झाले होते, पण सरकारकडून त्यांस केवळ 2550 रुपये मदत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्याचे जवळपास पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्यानंतर तब्बल अडीच हजार नुकसान भरपाई आल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. आता, हेच पैसे आम्ही कृषीमंत्र्यांना देणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील सुमित निंबाळकर यांना ही मदत आली असून इतर शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील बुहतांश जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. आर्थिक संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र, मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळण्यास सुरुवात झाली असून मिळणारी मदत अत्यंत तोडकी असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मे आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. जर आम्हाला मदत करायची असेल तर भरीव स्वरूपाची करा, अन्यथा शेतकऱ्यांची थट्टा करू नका, अशी भावना संतप्त शेतकऱ्यांची आहे. जरी आम्हाला मदत आली तरी आम्ही ती मदत सरकारला परत देऊ, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय.

मे महिन्यातील अतिवृष्टीसाठी मदतीचे निधी वाटप (heavy rain may 2025)

राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत "अवकाळी पाऊस व गारपीट" यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने शासनाने मदतीचे पॅकेज देखील जाहीर केले होते. फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 337 कोटी 41 लक्ष 53 हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी दिली होती. आता, शासनाने मंजूर केलेला हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.

हेक्टरी 50 हजारांची मागणी (Flood affected farmers)

दरम्यान, राज्यात जुलै व ऑगस्ट 2025 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 19 लाख 22 हजार 909 शेतकऱ्यांच्या 15 लाख 45 हजार 250.05 हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी 1339 कोटी 49 लाख 25 हजाराच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी यापू्र्वी दि दिली होती. शासनाकडून आता ती देखील मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, गेल्या 10-15 दिवसांत झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतआहे.

हेही वाचा

महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे नेतेमंडळी एकत्र

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Viral Video: मुंबई लोकलमध्ये मैत्रिणीसाठी केलं खास 'केळवण', व्हायरल व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
Wildlife Crime: सोन्याहून महाग 'व्हेलची उलटी', दीड कोटींच्या Ambergris सह दोघे Beed मध्ये अटकेत
Morning Prime Time Superfast News : 9.30 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 8 Nov 2025 : ABP Majha
Vote Theft Row: 'मतं कशी चोरली जातात?'; राहुल गांधींच्या आरोपानंतर मुंबई युथ काँग्रेस आक्रमक
Ground Zero Report: 'जमीन विकू नका!', Raigad जिल्ह्यातील ठाकरोली गावचा ऐतिहासिक निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Supreme Court on Mohammed Shami: मला महिन्याला 4 लाख पोटगी पुरत नाही! मोहम्मद शमीच्या विभक्त बायकोची सर्वोच्च न्यायालयात धाव; कोर्ट म्हणाले..
मला महिन्याला 4 लाख पोटगी पुरत नाही! मोहम्मद शमीच्या विभक्त बायकोची सर्वोच्च न्यायालयात धाव; कोर्ट म्हणाले..
Pune Land Scam Parth Pawar: 'ज्याच्या घरात गांजा सापडतो'.... अमेडिया जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारही दोषी, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा: विजय कुंभार
'ज्याच्या घरात गांजा सापडतो'.... अमेडिया जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारही दोषी, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा: विजय कुंभार
Devendra Fadnavis & Ajit Pawar: माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
CSMT Protest: आंदोलनकार्यकर्त्यांनी मोटारमनला लॉबीत बंद केलं, अन्....चौकशीत धक्कादायक खुलासा; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार?
आंदोलनकार्यकर्त्यांनी मोटारमनला लॉबीत बंद केलं, अन्....चौकशीत धक्कादायक खुलासा; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार?
Embed widget