एक्स्प्लोर

पुणे कालवा दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? कोर्टाचे विभागीय चौकशीचे आदेश

खुल्या कालव्यातून पुण्यासारख्या शहराला पाणीपुरवठा करणं हे फारच धोकादायक असल्याची चिंताही हायकोर्टाने व्यक्त केली.

मुंबई : पुणे कालवा दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? याची विभागीय चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करा, अन्यथा आम्हाला चौकशीचे आदेश द्यावे लागतील, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. तसेच या दुर्घटनेत विस्थापित झालेल्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला तात्काळ सक्रिय करा, असे निर्देशही हायकोर्टाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलणाऱ्या पुणे महानगरपालिका आणि सिंचन विभागावर नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने राज्य सरकारला यात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लावण्याचे निर्देश देत मंगळवारपर्यंत या संदर्भातील सुनावणी तहकूब केली आहे. प्रशासनाने या कालवा दुर्घटनेनंतर घाईघाईने मदतनिधीची घोषणा केली. मात्र डोक्यावरचं हक्काचं छत हरवलेल्यांचे सध्या अतोनात हाल होत आहेत. शालेय विद्यार्थी, वृद्ध यांचे सध्या तात्पुरत्या निवाऱ्यात फार हाल होत असल्याचं याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिलं. खुल्या कालव्यातून पुण्यासारख्या शहराला पाणीपुरवठा करणं हे फारच धोकादायक असल्याची चिंताही हायकोर्टाने व्यक्त केली. अश्याप्रकारे खुल्या कालव्यातून शेजारील भागांत बेकायदेशीर वस्ती करुन राहणाऱ्या लोकांना हवा तसा या पाण्याचा वापर करता येतो. त्यामुळे लवकरात लवकर इथं पाईपलाईनचं काम पूर्ण करावं असं मतही हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून निघणारा मुठा नदीच्या या कालव्याची एकूण लांबी ही जवळपास 220 किमी इतकी आहे. त्यापैकी 24 किमीचा कालवा पुणे शहरातून जातो. मात्र या कालव्याला खेटून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. सिंहगड रोडनजीकच्या भागात 27 सप्टेंबरच्या सकाळी अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या दुर्घटनेत सुमारे 980 जण बेघर झाले आहेत. वस्तीत घुसलेल्या पाण्याचा जोर इतका होता की, अनेकांचे संसार वाहून गेले. या दुर्घटनेतील पीडितांना तीन कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली. सर्वस्व गमावलेल्या अधिकृत कुटुंबाला 95 हजारांपर्यंतची मदत रोख रकमेत दिली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली. या दुर्घटनेसंदर्भात अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Pune Bhor Crime: न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन नवले पुलावर रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नसरापूर अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, कायदेशीर पावले उचलण्याच निर्देश
नसरापूर अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, कायदेशीर पावले उचलण्याच निर्देश

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Pune Crime Navale bridge: नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
नवले पूलावर पोलिसांकडून चिमुरडीच्या आई-वडिलांसोबत इमोशनल ब्लॅकमेलिंग, लाठीचार्ज केला? अमितेश कुमार म्हणाले....
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई, शेती मशागतीची काम ठप्प, दैनंदिन कामालाही मोठा फटका, नागरिक संतप्त
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई, शेती मशागतीची काम ठप्प, दैनंदिन कामालाही मोठा फटका, नागरिक संतप्त
Embed widget