एक्स्प्लोर

MLC Election 2024: विधानपरिषद निवडणुकीतून कोणाचीही माघार नाही, 11 जागांसाठी 12 जण लढणार, गुप्त मतदान कोणाचा घात करणार?

Maharashtra Politics: शेकापच्या जयंत पाटील यांना स्वत:ला विधानपरिषदेची निवडणूक लढायची असल्याने ते मविआला पाठिंबा देणार नाहीत. मविआतील तीन पक्षांकडे मिळून 65 आमदारांचे संख्याबळ.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक (MLC Election 2024) होत आहे. या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी विधानपरिषदेचे उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अपक्ष उमदेवार जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar)  यांच्यापैकी एकजण माघार घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळ संपूनही कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता येत्या 12 तारखेला विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC Election 2024) चुरस पाहायला मिळेल.

12 जुलैला विधान परिषदेसाठी विधिमंडळात मतदान पार पडेल. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने मोठ्याप्रमाणावर आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. तसेच गुप्त पद्धतीमुळे मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाची मतं फुटणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने (BJP) एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे  यांचा समावेश आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे मैदानात उतरले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील, काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्याने विधानपरिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीय संबंध या निवडणुकीत कामाला येणार का, हे पाहावे लागेल. तसे झाल्यास मिलिंद नार्वेकर सत्ताधारी महायुतीमधील कोणत्या पक्षाची मतं फोडणार, हे पाहावे लागेल.

कुणाकडे किती संख्याबळ ? 

महायुती

भाजप -103 शिंदे सेना – 37 राष्ट्रवादी (AP) - 39 छोटे पक्ष - 9 अपक्ष - 13 असे एकूण - 201 

मविआ

काँग्रेस - 37 ठाकरे गट - 15 राष्ट्रवादी (SP) - 13 शेकाप - 1 अपक्ष - 1 असे एकूण - 67 

 एमआयएम - 2, सपा - 2, माकप - 1 क्रां. शे. प. - 1 एकूण - 6 आमदार तटस्थ आहेत.


विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे.

आणखी वाचा

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

अखेर पंकजा मुंडेंना गुलाल लागणार?; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपकडून 3 पराभूत नेत्यांना संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sindhudurg Rain Update  : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, पुरात काही जण अडकले NDRF टीम कुडाळमध्येVijay Wadettiwar On Eknath Shinde : मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहेतAjit Pawar : मुंबईत जोरदार पाऊस, पाणी वाढण्याची शक्यता, लोकांनी घराबाहेर पडू नये : अजित पवारBelapur Train Accident : प्रचंड गर्दीमुळे महिलेचा रेल्वे रुळावर अपघात, दोन्ही पाय गमावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Sharad Pawar : शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसची जोरदार मोर्चे बांधणी; गावस्तरांवर 'मी उमेदवार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी काँग्रेसचा नेता' पॅटर्न 
Maharashtra Politics : शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
शिवसेना ते राष्ट्रवादी ते पार राहुल नार्वेकरांपर्यंत! थेट विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या याचिकांवर एकाच आठवड्यात सर्वोच्च सुनावणी
Embed widget