एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा दिल्लीत तीन ते चार वेळा फोन; विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबतची कोंडी कशी फुटली?

Uddhav Thackeray: विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास चारवेळा फोनवरून बोलणं झालं होतं.

मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी काँग्रेसने (Congress) उमेदवार न दिल्याने किंवा इतर कुठल्याही पक्षाने दहावा उमेदवार न दिल्याने अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी, AB फॉर्म देखील दिल्लीतून पाठवला होता. मात्र, अखेर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) दिल्लीत हायकमांडशी फोनवरून बोलणं केल्यानंतर ही कोंडी सुटली आणि काँग्रेसने माघार घेतली.

विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास चारवेळा फोनवरून बोलणं झालं होतं. तर उद्धव ठाकरे यांचंही काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासोबत तीन ते चार वेळा फोनवरून बोलणं झालं. पुढील राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या प्रस्तावावर एकमत होत नसल्याने थेट उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेते फोनवरून चर्चेत सहभागी झाले होते. त्यानंतर, दिल्लीकरांशी झालेल्या चर्चेअंती काँग्रेसने काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात बोलताना काँग्रेस उमेदवार देणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर, काहीवेळातच हा निर्णय झाला. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी दिल्लीत फोनवरून बोलणं केल्यामुळेच काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अंबादास दानवे यांना मान्य केल्याचं दिसून येत आहे. 

काँग्रेसची मविआसमोर नेमकी कोणती अट?  

दरम्यान, काँग्रेसने अंबादास दानवे यांना कोणत्या मुद्यावर पाठिंबा दिला? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. तर विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषदेसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र विधान परिषदेच्या होत असलेल्या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण 17 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात प्रमुख राजकीय पक्षांच्या नऊ उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत तर अपक्ष उमेदवार असलेल्या चौघांनी प्रत्येकी एक असे एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे आणि संबंधित उमेदवारांच्या अर्जावर सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या नसल्यामुळे हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. पर्यायाने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली असून याची औपचारिक घोषणा सोमवारी होईल..

हेही वाचा

राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल 
तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल 
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget