तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती; तेव्हा पंतप्रधान तुमचे बॉस झाले का? असा टोला कदमांनी ठाकरेंना लगावला. राज्याचा उपमुख्यमंत्री विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटू शकतो, असे कदम म्हणाले. तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत असेही कदम म्हणाले.
अधिवेशन काळात आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटींचा रामदास कदमांनी दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत, याची जाणीव ठेवावी. टीका करत बसा, आम्ही कामातून उत्तर देऊ असेही ते म्हणाले. अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांची आपल्या पिल्लाने बुके घेऊन भेट घेतली, याची माहिती घ्या. मग फडणवीस व अन्य नेते तुमच्या पिल्लाचे बॉस झाले का? असा सवालही कदम यांनी केला. अधिवेशन काळात आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटींचा रामदास कदम यांनी दाखला दिला आहे. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवा असेही कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेंविषयी केवळ द्वेष असल्याचे रामदास कदम म्हणाले. तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत असेही ते म्हणाले. टीका करत बसा, आम्ही कामातून उत्तर देऊ असे ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
चिंता नका, मी तुमच्या पाठिशी आहे हा धमकीवजा संदेश मोदींनी नेमका कोणाला दिलाय? आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा घाबरून तुमची पळापळ का होतेय? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय?" अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेत आहे. संविधानाबद्दल प्रेम असणाऱ्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशभक्तांना मी आवाहन करतोय की, तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांना आपल्या देशातले तरुण भेटत नाहीत, अगदी रात्री मध्यरात्री एकदम Friends म्हणून त्यांना Instagram वरून संदेश देतात. आता Instagram वरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे, एवढी यांची आता हालत खराब झाली आहे. जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात, ते यांनी करून दाखवलं. कारण एवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेली आहे.






















