Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: केंद्र सरकार विद्यार्थ्यांपुढे झुकलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे.

Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे 'कॉकरोच जनता पार्टी' आणि हजारो विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या तीव्र आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला (Central Government) झुकणे भाग पडले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या रेट्यानंतर शनिवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan Resignation) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या ऐतिहासिक घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया देत देशातील युवाशक्तीचे भरभरून कौतुक केले आहे.
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: नेमकं काय म्हणाले शरद पवार?
जंतर-मंतरवरील आंदोलक आणि विरोधी पक्षांनी एकमुखाने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. संपूर्ण देशात या आंदोलनाचे लोण पसरल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, "NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग 18 दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे."
NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2026
आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला…
"आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं," अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी






















