एक्स्प्लोर

Rais Shaikh: मुंबईतील पाच टोलनाक्यांप्रमाणे हलक्या वाहनांना पूर्ण राज्यात टोलमाफी द्या;आमदार रईस शेख यांची मागणी

मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आजपासून जशी पूर्ण टोलमाफी दिली, तशी टोलमाफी संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी केली आहे.

Rais Shaikh on Toll Free For Light Vehicles: मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना आजपासून जशी पूर्ण टोलमाफी दिली (Mumbai Toll Waiver), तशी टोलमाफी संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी केली आहे. तसेच नाशिक महामार्गाची टोल कंपनी दुरुस्ती करत नसल्याने पडघा टोलनाका बंद करण्याची मागणीही रईस शेख यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई एन्ट्री पाँइंटचे जे पाच मुख्य मार्ग आहेत, त्यांची दुरुस्ती टोल कंपन्यांकडून वेळेत कधीच होत नाही. तरीसुद्धा आजपर्यंत या पाचही मार्गावर वाहनांना टोल भरावा लागतो आहे. ही जनतेची लूट आहे. त्यासदंर्भात मी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र पाठवून टोल रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नियमबाह्य टोल वसुलीचा प्रकार राज्यात सर्वत्र आहे. उदाहरण नाशिक महामार्गाचे घ्या. या महामार्गावर टोल कंपनी रस्त्याची दुरुस्ती करत नाही. तरीसुद्धा पडघा येथे टोल वसूल केला जात आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात टोल कंपन्यांची अशी लूट सुरु आहे. ही सामान्यांची वाटमारी आहे. ती शासन कधी थांबवणार आहे, असा सवाल आमदार रईस शेख यांनी महायुती सरकारला केला आहे.

कडक लक्ष ठेवल्यास राज्यातले 50 टक्के टोल बंद होतील- रईस शेख

टोलवसुलीची माहिती संकेतस्थळावरून दिली पाहिजे, असे परिपत्रक केंद्र सरकारने 2013 साली काढले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशाला सर्व टोल कंपन्या आणि राज्यांनी केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याचा खर्च निघूनही शेकडो टोल सुरु आहेत, असा आरोप आमदार रईस शेख यांनी केला. सरकारने टोल कंपन्यांवर कडक लक्ष ठेवल्यास राज्यातले 50 टक्के टोल बंद होतील, असे आमदार रईस शेख म्हणाले.

मुंबई टोलमुक्त करा - रईस शेख

मुंबईत येणारे 5 एन्ट्री पॉईंटचे रस्ते आणि शहरातील 27 फ्लायओवर्स यांची देखभाल आणि दुरुस्ती टोल कंपन्या यांच्याकडून होत नाही. त्यामुळे मुंबई पूर्णपणे टोलमुक्त करावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जानेवारी 2023 मध्ये पत्र लिहून केली होती.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीसZero Hour Mumbai Toll Naka : वेशीवर एकूण 5 टोलनाके, मुंबईतील टोलचा इतिहास काय?Zero Hour Baba Siddique : हत्या एकं, वळणं अनेक, सिद्दिकी केसचं पुणे कनेक्शनZero Hour Bhai Jagtap :  आकर्षक घोषणांच्या पावसानं मतांचं पीक देणार? विधानसभेचं चित्र काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
भारताने कॅनडाला खडसावले, उच्चायुक्त माघारी बोलावले; कॅनडाच्या अधिकाऱ्यांना दिल्ली सोडण्यासाठी 19 ऑक्टोबरपर्यंत वेळ
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Atul Parchure Passes Away : अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
MNS activist killed : कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
कट मारल्यामुळे बाचाबाची, रिक्षाचालक अन् फेरीवाल्यांनी मिळून मनसे कार्यकर्त्याला संपवल्याचा दावा, मालाड पूर्वेत आत्तापर्यंत काय घडलं?
World War II Bomb : जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
जर्मनीत सापडला दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब! 5 हजार लोकांना सुरक्षितस्थळी नेलं, निकामी करण्यास किती तास लागले?
Sharad Pawar : आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहिण आठवली; शरद पवारांचा हल्लाबोल
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
Embed widget