एक्स्प्लोर

Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून यापूर्वीच गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री रविंद्र वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करुन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांचा प्रवेश हा दबावतंत्राने झाल्याची चर्चा राजकीय (Politics) वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे रविंद्र वायकर यांनीही काही दिवसांपूर्वी थेट भाष्य करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. विशेष म्हणजे रवींद्र वायकर (Ravindra waikar) यांना एकनाथ शिंदे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र, अशा गरमागरमीच्या काळात वायकर यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर यांना गद्दार म्हणत त्यांची उमेदवारी कुठलंही चॅलेंज नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून यापूर्वीच गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, आता ठाकरेंनी रवींद्र वायकर हे गद्दार असून त्यांचं आव्हान वाटत नसल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेच्या अमोल किर्तीकरांना रवींद्र वायकर यांचे आव्हान नाही, ते गद्दार आहेत. त्यांनी एकप्रकारे भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे, त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते. पण, अमोल घाबरला नाही, अमोल ताठ मानेने उभा राहिला. येथील मतदार शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, त्यांना या गद्दारांविषयी राग असून लोकांना लढणारा माणूस आवडतो, असे म्हणत अमोल किर्तीकर यांच्या पाठिशी मुंबईतील जनता असल्याचंही ठाकरेंनी बोलून दाखवलं. निवडणूक काळात जो कारवाईचा फास दिसून येत आहे, तो फास केवळ 4 जूनपर्यंत राहिल. कारण, हा फास तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

रवींद्र वायकरांची हतबलता

जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला, असं म्हणणारे रवींद्र वायकर ठाकरेंना छुपी मदत करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण शिंदे गटात प्रवेश करतानाही रवींद्र वायकर यांचा चेहरा पडलेलाच दिसत होता. त्यामुळे शिंदे गटातून निवडणूक लढताना वायकर जोर लावणार की, छुपी मदत करणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यातच, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या विधानामुळेही त्यांची हतबलता आणि मनातील खदखद जनतेसमोर आली आहे. 

ठाकरेंचा जेपी नड्डांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानावर पलटवार केला आहे. भाजप जिंकणार तर नाही. भाजप जिंकल्यास भाजपकडून संघावर बंदी आणली जाऊ शकेल, नरेंद्र मोदीच संघावर बंदी आणतील, असे ठाकरेंनी म्हटले आहे. आजपर्यंत वल्लभाई पटेल यांच्यानंतर भाजप व नरेंद्र मोदी हेच संघावर बंदी आणतील, वल्लभभाईंनी केलं तेच मोदी करतील, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

काय म्हणाले होते जेपी नड्डा

दरम्यान, अलटबिहारी वाजपेयींच्या काळात भाजप पक्षाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. कारण, भाजप तेव्हा छोटा व मर्यादीत पक्ष होता.  मात्र, आता आम्ही सक्षम बनलो आहोत, आमचा पक्ष मोठा झाला आहे, भाजप आता स्वत:चं पक्ष चालवत आहे, असे जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल
भाषणात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर भाजपत घेतलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा फास्ट ट्रॅक कोर्ट करा, त्यांची सुरु असलेली सीबीआय चौकशी का थांबवली? कपिल सिब्बलांचा मोदींवर हल्लाबोल

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget