एक्स्प्लोर

Raj Thackeray : शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं

Raj Thackeray Pune Speech : जर काँग्रेससाठी मशिदीतून फतवे काढले जात असतील तर हिंदूंनीही एकत्र येऊन भाजपच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. 

पुणे : कुणीतरी उठतोय आणि जातीचं राजकारण करतोय, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बरबाद झाल्याचं सांगत 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयतेचं विष पेरलं गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला. शरद पवारांसोबत राहूनही अजित पवार (Ajit Pawar) या माणसाने कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असंही ते म्हणाले. जर काँग्रेससाठी मशिदीतून फतवे निघत असतील तर राज ठाकरे आज फतवा काढतोय की भारतीय जनता पक्षाला मतदान करा, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे जातीयतेचं राजकारण

राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीयतेचं राजकारण सुरू झालं. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झालं. भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झालं. पण राष्ट्रवादीतील अजित पवार या माणसाने कधीही जातीचं राजकारण केलं नाही. शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी जातीचं राजकारण केलं नाही. 

हिंदूंसाठी जाहीर आवाहन

राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेससाठी जर मशिदीतून फतवे निघत असतील, मतदान करा म्हणून मशिदींमधले मौलवी फतवे काढत असतील, तर आज हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो, मुलीधर मोहोळ आणि शिंदे-अजित पवारांच्या उमेदवारांना मतदान करा.

ही निवडणूक मुद्दे नसलेली

राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्यांनी 1971 पासून ते आतापर्यंतच्या निवडणुकीतील विषयांचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की, ही पहिली निवडणूक पाहतोय ज्याला काहीही विषय नाही, कोणताही अजेंडा नाही. त्यामुळेच प्रत्येकजण शिव्या देत सुटलाय. महाराष्ट्र असा कधी नव्हता. महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी लोकांना वेगळ्याच विषयांमध्ये गुंतवून ठेवलंय. 

अनेक लोक आता देश सोडून जात आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण. जे काही राजकीय मुद्दे असतात ते खालपर्यंत जातात आणि वातावरण गढूळ बनतं. त्यामुळे आमदार-खासदारांची जबाबदारी आहे की त्यांनी सभोवतालचं वातावरण चांगलं ठेवणं असं राज ठाकरे म्हणाले. 

मुंबई शहर बरबाद व्हायला एक काळ गेला, पण पुण्याची वाट लागायला वेळ नाही लागणार. जर नियोजन नसेल तर शहर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला. 

राज ठाकरे म्हणाले की, "प्रत्येक शहराची एक मानसिकता आहे. मुंबईत लोकलने प्रवास हा वर्षानुवर्षे सुरू आहे. पुण्यामध्ये कुठे जायचं  असेल तर लगेच गाडी काढली जाते. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या दहा वर्षांमध्ये 30 लाख लोक बाहेरून आली. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगांसाठी आलं आहे. आज पुण्यात 70 लाख लोकसंख्या आहे, पण शहरातील वाहनांची संख्या ही 72 लाख आहे."

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Sunil Pal: एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Embed widget