एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: पंतप्रधान मोदींचं संतुलन बिघडलंय, गांधीजींबाबत त्यांचं वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव : पृथ्वीराज चव्हाण

श्रीमंत लोकांसाठी वेगळा कायदा सुरु आहे पण जनता आता स्वतः न्याय देईल. हे सरकार जनता उलथावून टाकेल, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

मुंबई महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. मोदींच्या या वक्तव्याची राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी  देखील मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जगात महात्मा गांधी यांचे किती  महत्व आहे, हे मोदींना माहिती नाही . त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव, अशी  प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान मोदींचा संतुलन बिघडले आहे. काय वाटेल ते बोलणे सुरु आहे . त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर राग काढला. जगात महात्मा गांधी यांचे महत्व मोदींना माहिती नाही . त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे दुर्दैव आहे.

महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत : पृथ्वीराज चव्हाण

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरावर देखील पृथ्वीराज चव्हाणांनी  प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  महाराष्ट्रमध्ये भ्रष्टाचार सरकार कार्यरत आहेत. अधिकारी पैसे देऊन खुर्चीवर बसलेत. भ्रष्टाचार करून हे सरकार सत्तेत आले आहे. श्रीमंत लोकांसाठी वेगळा कायदा सुरु आहे पण जनता आता स्वतः न्याय देईल. हे सरकार जनता उलथावून टाकेल, असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

आचारसंहिता असली तरी दुष्काळ थांबणार नाही : पृथ्वीराज चव्हाण

राज्याच्या काही भागात भीषण परिस्थिती निर्माण झली आहे. या विषयी बोलताना चव्हाण म्हणाले,  काँग्रेसने विभागवर समिती नेमल्या आहेत आचारसंहिता असली तरी दुष्काळ थांबणार नाही . आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी केली आहे  कराडमधील बैठक आहे, त्यानंतर जिल्हावारं दौरे करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राजकारणात सहकारात मोठी पोकळी निर्माण झाली : पृथ्वीराज चव्हाण

आमदार पी. एन पाटलांविषयी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमदार पी. एन पाटील निष्ठावंत कार्यकर्ता  होते. सहकारात चांगले कामं, काँग्रेसवाढीसाठी त्यांनी योगदान दिले. ज्येष्ठत्वाने त्यांना मंत्री मिळायाला पाहिजे होते, पण दुर्दैवाने मिळाले नाही . त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा होती पण नियतीसमोर कोणाचं काय चालत नाही. लोकसभा निवडणुकीत गावं आणि गावं पिंजून काढले आहे . आमचा सहकारी सोडून गेला, महाराष्ट्र राजकारणात सहकारात पोकळी निर्माण झाली आहे.  

हे ही वाचा :

संविधानाचं रक्षण करण्याची आणि निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी; मनमोहन सिंहांचं जनतेला आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget