एक्स्प्लोर

Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्रामदिन: स्थलांतरित मराठवाडा – चिंता व चिंतन

Marathwada Liberation Day: देश स्वतंत्र झाल्यानंतर खूप उशिरा मराठवाड्याला निजामशाहीच्या जोखडातून स्वातंत्र्य मिळाले. या काळात मराठवाड्यातील जनतेने अन्याय, दडपशाही आणि विषमता भोगली. स्वातंत्र्यानंतरही प्रश्न संपले नाहीत. उलट जीवनावश्यक गरजांसाठी आणि प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर मराठवाड्याचे पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबई या शहरांकडे स्थलांतर झाले.

स्थलांतराची दोन प्रमुख कारणे होती.शिक्षण आणि रोजगार. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज लक्षणीय प्रमाणात मराठवाड्याचे लोक वास्तव्यास आहेत. अभिमानास्पद बाब म्हणजे त्यांनी स्वतःच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे.हेवा वाटावी अशी बाब आहे.

विशेषतः शिक्षणात 40 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी मराठवाड्यातूनच पुण्यात येतात. “शिक्षणाशिवाय प्रगती नाही” हे त्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे ते मोठ्या हिंमतीने, कौटुंबिक व नैसर्गिक अडचणी झेलत पुढे सरसावत आहेत.अनेकजण महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असून, मराठवाड्याचे वैभव उजळवत आहेत. पण दुसरीकडे चिंता वाढवणारी बाजूही तितकीच गंभीर आहे. समाजातील परिस्थिती झपाट्याने बदलत असून ती चिंताजनक बनली आहे.आरक्षणांचे प्रश्न ऐरणीवर आहे.अजूनही शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, रोजगारासाठी मराठवाड्यातून स्थलांतर का करावे लागते..! काही जिल्ह्यांची नावे जरी काढली तरी साशंकतेने लोक पाहतात, ही वस्तुस्थिती सद्याची वेदनादायी आहे.

खरं तर मराठवाड्याचे लोक कधीही संकुचित व प्रांतिक भूमिका घेत नाहीत, हे त्यांचे वेगळेपण जपलेले आहे. पण वास्तवाचा विचार केला तर इतर प्रादेशिक भागांच्या तुलनेत मराठवाड्याचे प्रश्न अधिक दाहक व तीव्र भासतात. यामागे अनेक कंगोरे आहेत.राजकीय उदासीनता, प्रशासकीय दुर्लक्ष, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संधींचा अभाव. आजही मराठवाड्यात दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कॅम्पस अपुरे आहेत. रोजगाराच्या संधी नाहीत. आरोग्यासाठी मोठ्या शहरांचा रस्ता धरावा लागतो. तरुणाईसमोर “कार्यकर्ता” ही एकमेव ओळख उरली आहे. कारण कार्यकर्त्यासाठी येथे सुपीक जमीन आहे. मात्र पुढे काय? कार्यकर्त्याच्या पलीकडे भविष्य कुठे आहे?

जर हीच स्थिती कायम राहिली, तर पुढील दहा वर्षांत 70 टक्के मराठवाडा मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होईल, ही भाकितवाणी अतिशयोक्ती वाटली. तरी पूर्णतः अशक्य नाही. मराठवाडा रिकामा होत चाललेला असेल, तर तिथे आणि येथेही राहणाऱ्यांच्या भविष्याचे काय? प्रश्न गंभीर आहेत, उत्तरं मात्र शोधली जात नाहीत. “सध्या तरी जे चाललंय ते बरंय” या मानसिकतेत आपण सुख मानतोय की “कधीतरी काहीतरी बदलेल” या अपेक्षेवर जगतोय? हा विचारच अधिक अस्वस्थ करणारा आहे. म्हणूनच मराठवाड्याची चिंता आणि चिंतन ही केवळ चर्चा न राहता ती कृतीत उतरली पाहिजे. अन्यथा स्थलांतरित मराठवाड्याची वेदना आणि रिकामं होत चाललेली गावे ही आपल्या समोर गंभीर वास्तव म्हणून उभी राहतील.

- अँड. कुलदीप आंबेकर
संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हँड्स

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Devendra Fadnavis: 'फडणवीस कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर..' राजू शेट्टींचा कडाडून हल्लाबोल
'फडणवीस कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर..' राजू शेट्टींचा कडाडून हल्लाबोल
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'फडणवीस कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर..' राजू शेट्टींचा कडाडून हल्लाबोल
'फडणवीस कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर..' राजू शेट्टींचा कडाडून हल्लाबोल
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
Embed widget