एक्स्प्लोर

संविधानाचं रक्षण करण्याची आणि निरंकुश राजवट संपवण्याची शेवटची संधी; मनमोहन सिंहांचं जनतेला आवाहन

Lok Sabha Elections 2024: भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. निरंकुश राजवटीचा अंत करून आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्याची आपल्याकडे शेवटची संधी आहे, असं मनमोहन सिंह म्हणाले आहेत.

Lok Sabha Elections 2024 Latest News: नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 चा (Lok Sabha Election 2024) अंतिम टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी मतदारांना विशेष आवाहन केलं आहे. मनमोहन सिंह यांनी गुरुवारी (30 मे 2024) एक पत्रक जारी करून पंजाबच्या (Punjab Lok Sabha Election 2024) जनतेला हे आवाहन केलं आहे. मतदानाच्या अंतिम फेरीत, निरंकुश राजवटीचा अंत करून आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्याची आपल्याकडे शेवटची संधी आहे, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले आहेत. तसेच, 10 वर्षांत भाजपनं पंजाबला बदनाम केलंय, असंही ते म्हणाले आहेत. 

डॉ. मनमोहन सिंह यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे की, माझ्या प्रिय नागरिकांनो, भारत एका गंभीर वळणावर उभा आहे. मतदानाच्या अंतिम फेरीत, निरंकुश राजवटीचा अंत करून आपल्या लोकशाहीचे आणि आपल्या संविधानाचं रक्षण करण्याची आपल्याकडे शेवटची संधी आहे. पंजाब आणि पंजाबी हे योद्धे आहेत. आपण आपल्या त्याग आणि बलिदानासाठी ओळखले जातो. आपले अदम्य धैर्य आणि सर्वसमावेशक, सौहार्द, सद्भाव आणि बंधुत्वाच्या लोकशाही मूल्यांवरचा जन्मजात विश्वास आपल्या महान राष्ट्राला वाचवू शकतो.

10 वर्षांत भाजपनं पंजाबला बदनाम केलं : मनमोहन सिंह 

मनमोहन सिंहांनी पत्रात पुढे लिहिलंय की, गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारनं पंजाब आणि पंजाबींना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. पंजाबचे 750 शेतकरी शहीद झालेत. शेतकरी सलग तीन महिन्यांपर्यंत दिल्लीच्या सीमांवर वाट पाहत होते. सरकारनं त्यांच्यावर हल्ले केले. शेतकऱ्यांना संसदेत आंदोलनजीवी आणि परजीवी म्हटलं गेलं. 

2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं मोदींनी वचन दिलेलं, पण... : मनमोहन सिंह 

मनमोहन सिंह म्हणाले की, 2022 पर्यंत आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं. पण, उलट गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं आहे. आपली शेती, कुटुंब उद्ध्वस्त केलीत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यावेळी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात 'शेतकरी न्याय' अंतर्गत 5 हमीभाव आहेत. काँग्रेसनं एमएसपीची कायदेशीर हमी, शेतीसाठी स्थिर निर्यात-आयात धोरण, कर्जमाफी आणि इतर अनेक घोषणा जाहीर केल्या आहेत.

मनमोहन सिंह यांनीही पत्रात मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, गेल्या 10 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी, कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय यामुळे दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात जीडीपीचा सरासरी वाढीचा दर 6 टक्क्यांहून कमी राहिला आहे, तर काँग्रेस-यूपीएच्या कार्यकाळात तो 8 टक्क्यांच्या आसपास होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी प्रचार थांबणार असून 1 जूनला अखेरच्या टप्प्यात 8 राज्यांत 57 जागांवर मतदान पार पडणार आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget