एक्स्प्लोर

Prakash Mahajan Resign : माझ्या त्या भूमिकेबद्दल ऐकवलं; आता सोबत आले, दोन्ही भाऊ आम्हाला विसरले, मनसेला रामराम ठोकल्यावर काय म्हणाले महाजन?

Prakash Mahajan Resign : गेल्या काही काळापासून ते मनसेच्या प्रमुख कार्यक्रमांपासून लांब राहात होते. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांंच्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांची खदखद व्यक्त केली आहे.

Prakash Mahajan Resign : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS)  मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan Resign) यांनी राजीनामा देत मनसेला रामराम केला आहे. त्यांनी प्रवक्तेपदाबरोबरच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा होती. काही महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून आणि मेळाव्यांपासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचे बोलले जात होते. नाशिकच्या मेळाव्याला त्यांना बोलावले गेले नाही, तसेच प्रवक्तेपद असूनही काही वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या. यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मध्यंतरी महाजन यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यातून फारसे यश आले नाही. गेल्या काही काळापासून ते मनसेच्या प्रमुख कार्यक्रमांपासून लांब राहात होते. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांंच्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांची खदखद व्यक्त केली आहे.

दोन भाऊ आम्हालाच विसरून गेले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले नाही तर नियती त्यांना माफ करणार नाही, असं काही दिवसांपूर्वी प्रकाश महाजन यांनी म्हटलं होतं. हे वक्तव्यच तुमच्यासाठी राजीनाम्याचे कारण ठरले का? या एबीपीच्या प्रश्नावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, मी असलो काय आणि नसलो काय? माझी प्रामाणिक भूमिका होती की, दोन्ही भावांनी एकत्र यावं. माझ्या वक्तव्याविषयी तेव्हा मला खूप ऐकावे लागले. पण, शेवटी दोन भाऊ एकत्र आलेच ना. त्यावेळेस माझी कुणाला आठवण झाली नाही की, मी अशी भूमिका घेतली होती. मी जोपर्यंत तिथे होतो मी प्रामाणिकपणे काम केले. मी दोन महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आज दोन भाऊ एकत्र आले ही चांगलीच गोष्ट आहे. नाशिकमध्ये इतका मोठा मोर्चा निघाला. आता दोन भाऊ आम्हालाच विसरून गेले, त्याला आम्ही काय करू शकतो? असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

माझा बाकी कोणावर राग नाही 

माझा थोडं वय वाढलं आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही असे त्यांनी म्हटले. नारायण राणेंना आव्हान देणे तुम्हाला भावलं का? असे विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, नाही तसे काहीही नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी थांबलेलो आहे. बाकी काहीही नाही, असे देखील त्यांनी सांगितले. 

या वयात मनस्थिती चांगली राहिली पाहिजे

तुमचा कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे? याबाबत विचारले असता मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे. माझा काय आक्षेप असणार? मी कुठल्याही मोठ्या पदावर नव्हतो. माझ्यासारखा छोटासा प्रवक्ता राहिला काय आणि गेला काय? फार मोठा परिणाम होणार नाही. पण या वयात आपली मनस्थिती चांगली राहिली पाहिजे म्हणून मी ठरवले की, आता या सर्व गोष्टींपासून आपण दूर जावे, असे प्रकाश महाजन म्हणाले.  

आपणच बाहेर पडलेले काय वाईट

तुमच्या मनाविरुद्ध नेमकं काय घडलं? याबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, काही गोष्टी आहेत. कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा आपणच बाहेर पडलेले काय वाईट आहे. बाकी कुणावर राग असण्याचे कारण नाही. वाईट या गोष्टीचे वाटते की, मी अमित ठाकरे यांना दिलेला शब्द पाळू शकलेलो नाही, असे त्यांनी म्हटले. 

स्थापनेपासून पक्षात सक्रीय

प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे भाऊ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते. मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून त्यांचा प्रभाव मानला जायचा. टीव्ही डिबेट शोमध्ये ते मनसेची बाजू ठामपणे मांडायचे. अलीकडेच त्यांचा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत शाब्दिक वाद रंगला होता. विशेष म्हणजे, राणे आणि राज ठाकरे यांच्यात दृढ मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्या अस्वस्थतेमागे ही सर्व कारणे असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget