एक्स्प्लोर

मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका

उद्धव ठाकरेंनी कवितांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. आता, उद्धव ठाकरेंच्य कवितापर भाषणवरुन निलम गोऱ्हेंनी पलटवार केला आहे. 

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून विधानपरिषदेतील 9 आमदारांचं हे शेवटचं अधिवेशन होतं. त्यामुळे, या 9 आमदारांच्या कार्यावर प्रकाश टाकत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना निरोप दिला. विशेष म्हणजे, निवृत्त होणाऱ्या विधानपरिषद सदस्यांमध्ये शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही (Uddhav Thackeray) समावेश होता. तसेच, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनेकर यांच्यासह नऊ सदस्य मे महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे, सभागृहात काहीसं भावनिक वातावरण होतं. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. तर, उद्धव ठाकरे साहेब म्हणत एकनाथ शिंदेंनीही शुभेच्छा दिल्या. त्यावर, बोलताना उद्धव ठाकरेंनी कवितांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. आता, उद्धव ठाकरेंच्य कवितापर भाषणवरुन निलम गोऱ्हेंनी (Neelam gorhe) पलटवार केला आहे. 

साजीश की सौगात पहनकर बैठ गए
जिनको मेरा हाथ पकडकर बैठना था 
हैरत है की वो बात पकडकर बैठ गए !

अशी शायरी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी म्हटली होती, तसेच उद्धव ठाकरेंचा पिंड राजकारणाचा नसून ते उत्तर कलाकार, फोटोग्राफर असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर, माझा पिंड हा राजकारणाचा नाही, माझा मूळ स्वभाव कलाकाराचा आहे. एवढं उत्तम वर्णन केल्यानंतर, एवढं तुम्ही जवळून ओळखता म्हणल्यानंतर ऐसी कौनसी बात थी और किसका हात पकडना पडा, असा सवाल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. तसेच, उद्धवा अजब तुझे सरकार.. असे म्हणत कवितेच्या माध्यमातून फडणवीसांसह शिंदे गटालाही लक्ष्य केलं. आता, शिंदे गटाकडून निलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर पटलवार केला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी कविता वाचून दाखवली, ती कविता ही त्यांच्या बाबतचीच होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. पण शेवटच्या 1 वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष-वर्ष कुणाला भेटत नव्हते, तिथ गेलं की लक्षात यायचं की यांना आम्ही नको आहोत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला जायचं तेव्हा आपण नकोसे आहोत अशी खात्री पटायची, कोव्हीड मध्ये आठवड्याला मिलिंद तर 8-8 वेळा टेस्ट करायचा कोव्हीडची. आत्ता तू बोलू नको, किती एखाद्या माणसाला त्रास द्यायचा, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. कोविडमध्ये मी काम केलं असं उद्धव ठाकरे म्हणतात, अहो शिंदेसाहेब सुद्धा काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केलं ना. ते म्हणाले रेडा कापला, अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात हे माहिती आहे. प्रत्येकवेळा कही पे निगाहे कही पे निशाणा सारखं सारखं कशाला? असा सवाल निलम गोऱ्हेंनी केला. तसेच, मला माहिती आहे, मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलण गरजेच आहे असेही त्यांनी म्हटले. 

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..

असे म्हणत निलम गोऱ्हेंनी देखील उद्धव ठाकरेंना कवितेतून प्रत्युत्तर दिलंय. 

हेही वाचा

अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget